निरा नरसिंहपुर दि ०९ :- शेतकऱ्यांच्या शेत मालाला चांगला बाजार भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पारदर्शी पध्दतीने कारभार करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्चा वतीने भरविण्यात आलेल्या कृषी प्रर्दशनाच्या उद्घाघाटन प्रसंगी ते बोलत होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले सध्या राज्यात असणारे सरकार अनैसर्गिकरित्या आले राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे.
राज्यातील दुसरे मोठे असणारे कृषी प्रर्दशन एक नंबरचे होण्यासाठी आपण पूर्णपणे मदत करू. अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगला भाव येण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मजबुतीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा.
सध्याच्या सरकारचे खाते व बंगले वाटप झाले.परंतु शेतकऱ्यांचे काय ?सध्याच्या मुख्यमंत्राना हेक्टरी व एकर मधला फरक कळतो का ? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.सध्याच्या सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असुन यामध्ये ऊस उत्पादक, गाई म्हशी शेतीवाहन व अवजारे कर्ज, मध्यम मुदत कर्ज बसणार नाही. तर २०१६ पूर्वीची थकीत पीककर्ज आमच्या सरकारने माफ केलेली आहेत.
विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगली व कोल्हापुर पुरग्रस्तांना २५रू. हेक्टरी मागणी केली होती. ती सरकारने पूर्ण करावी.
माजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी कोल्हापुरच्या पुरामुळे शीळफाटा येथील सेंद्रीय पध्दतीने केलेले ऊस पिकांचे नुकसान झाले नाही.त्याचा केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून अभ्यास केला आहे. सेंद्रीय शेतीला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार आहे.
यावेळी बोलताना माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सलग ३रे वर्ष असुन राज्यात दुसऱ्या क्रमाकांचे प्रर्दशन आहे. अधुनिक शेती व शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे या प्रर्दशनाचा उद्देश असुन परिसराला प्रर्दशन वरदान ठरणारे आहे. सभापती अप्पासो. जगदाळे हे बाजार समितीच्या माध्यमातुन चांगली सेवा देत आहेत.
सभापति अप्पासो.जगदाळे यांनी प्रास्तविकात गेल्या ३ वर्षापासुन हे प्रर्दशन सुरू असुन त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर पुणे जिल्हातील एकमेव घोडे बाजार व डॉग शो विशेष आकर्षण ठरत आहे. त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व माजी खा.रणजितसिह मोहीते पाटील यांना भा.ज.प.ने योग्य सन्मान देऊन राज्याची जबाबदारी देण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले तर आभार सचिन भाग्यवंत यांनी मानले.
या वेळी मदनसिंह मोहिते पाटील रावसाहेब मगर ,पृथ्वीराज जाचक, उदयसिंह पाटील, भा.ज.प. तालुका अध्यक्ष नानासो. शेंडे, पं. स.सभापति सौ . पुष्पा रेडके,विलास वाघमोडे,मंगेश पाटील,भरत शहा मारूतराव वणवे इ.. मान्यवर उपस्थित होते.
स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचल कांनी केले.
चौकट
१ )राज्यातील महाआघाडी सरकार भारतीय जनता पार्टी पाडणार नसल्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
२ )भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेल्याना पार्टी वाऱ्यांवर सोडणार नसुन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व माजी खा.रणजितसिंह मोहीते पाटील यांना पूर्ण ताकद देईल. अशी ग्वाही त्यांनी देताच टाळ्याचा कडकडाट कार्यकार्त्यानी केला.
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार