श्रीगोंदा दि.१३:-गुन्हेगारांना पकडणं तसं सोपं काम नाहीच! त्यासाठी पोलिसांना कोणकोणत्या युक्त्या शोधाव्या लागतात आणि कोणकोणत्या दिव्यातून पार पडावं लागतं ते तेच जाणोत!अशा प्रकारेच श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत परिसरातील दिनकर घोडके यांच्या शेताजवळ ८ फेब्रुवारी रोजी सापडलेला शिर नसलेला मृतदेहाची ओळख पटविण्यात आणि खुनाचा उलगडा करण्यात श्रीगोंदा पोलीसांना यश आले असून मयत रमेश जाधव यांचा कोयत्याने वार करत खून करण्यात आल्याचे समोर आले आहे . या प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाण वरून ५ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून यात एक महीला तर एक अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती समजते.
८ फेब्रुवारी रोजी टाकळी कडेवळीत शिवारात शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. शिर नसल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचे श्रीगोंदा पोलिसांसमोर आव्हान असताना. दोन दिवसांत मृताची ओळख पटवत संशयीत आरोपींपर्यंत पोहोचण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले असून. या गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव , पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सुरवातीला बारामती येथून एका महिलेसह अन्य दोघे ताब्यात घेण्यात आले होते . काल दि १२ ( शुक्रवार ) रात्री मुंबई येथून आणखी दोन संशियतांना ताब्यात घेण्यात आले आहे . या पाचही संशयीत आरोपींकडे विचारपूस सुरू असून त्यांनी या गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती असून ३१ जानेवारी रोजी सायंकाळी मयत रमेश जाधव यांचा खून केला असून.अतिशय नियोजनबद्ध हा खून करण्यात आला आहे.जाधव यांच्यावर सुरुवातीला गावठी कट्ट्यामधून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला , मात्र कट्टयामध्ये गोळी अडकली गेल्याने दुसऱ्या एका आरोपीने हातातील कोयत्याने सपासप वार करत मयत जाधव यांचे शीर धडावेगळे केल्याची कबुली आरोपींनी दिली असून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हा प्रकार करण्यात आला होता.सध्या आरोपींना अटक करण्यात आली असून अजून कोणी यामध्ये सामील आहे का ? याचा तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत. लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होईल असा विश्वास पोलिस यंत्रणेनी व्यक्त केला.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे