बोरघर / माणगांव दि ०१:- ( विश्वास गायकवाड ) श्रीवर्धन आगारात साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांची जन्म शताब्दी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास आगार व्यवस्थापक मा रेश्मा गाडेकर , सहायक कार्यशाळा अधीक्षक प्रदिप विचारे ,वरिष्ठ लिपिक सागर वाढवलं ,मंगेश चांदोरकर ,प्रसाद मोरे,विठ्ठल वाघमारे, तुकाराम भालेराव, माकनिकर ,उमेश मोरे नितीन कर्जावकर , कास्टट्राईब संघटना सचिव राहुल गायकवाड उपस्थित होते. प्रथमता आगार व्यवस्थापक मा रेश्मा गाडेकर यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला,तद्नंतर मा . प्रदीप विचारे यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले,तर मा सागर वाढवलं यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
या वेळी आगार व्यवस्थापक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यासम्पूर्ण जीवनचरित्र माहिती दिली अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे .
या कार्यक्रमाचे सम्पूर्ण सूत्र संचालन राहुल गायकवाड यांनी केले..