पुणे, दि.०५ :- भारतीय संस्कृतीत गुरुजनांचा आदर, सन्मान करण्याची प्राचीन परंपरा आहे. या संस्कृतीची जपवणूक ज्यावेळी विदयार्थी शिक्षकांचा गुरु पौराणिमा वा शिक्षकदिनी सत्कार करतात त्यावेळी तो शिक्षकाचा सर्वोच्य सन्मान असतो, असे मत जिनिअस टॅलेंट सर्चच्या सांचालिका प्रा. छाया पांचाळ यांनी व्यक्त केले.
शिक्षक, पालक, विदयार्थी यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
विदयार्थी घडविण्याचे काम पालकां बरोबरच शिक्षक करीत असतो. शिक्षकांच्या संस्कारामुळे आदर्श सुजाण नागरिक घडविण्याचे मोलाचे काम होत असते. विदर्थ्याच्या होणाऱ्या प्रगतीचा शिक्ष काना नेहमीच आनंद होत असतो, असेही पांचाळ यांनी नमूद केले.
सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुलींनीही शिक्षण घेतले पाहिजे, या आग्रहामुळे आज स्त्री साक्षर झाली. प्रगतीची सर्व क्षेत्रे तिने पादाक्रांत केली. अश्या ऋषितुल्य व्यक्तींचे कायम स्मरण राहील, असेही प्रा. पांचाळ यांनी नमूद केले.
जिनिअस तर्फे ग्रामीण भागातील गरीब समाजातील शिक्षणापासून वंचित असलेल्या विशेष विदर्थ्यानसाठी स्पर्धा परीक्षाचे दालन खुले करण्यात आले आहे, असेही पांचाळ यांनी सांगितले.