टेंभुर्णी दि१२ : – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला असून शेतीमाल आणि जीवनावश्यक वस्तू कायद्या संदर्भातील मोदी सरकारचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत.त्या निर्णयाचा रयत क्रांती संघटनेतर्फे टेंभुर्णीत विजयोत्सव साजरा करण्यात आला.मोदी सरकारने शेतकऱ्याला सर्वच बाजारपेठा खुल्या केल्या असून शेतकरी आता स्वतः आपल्या मालाचे मार्केटिंग करू शकणार आहे.या निर्णयाचा रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना येत्या ११ जूनला सकाळी ११ वा.विजय दिवस साजरा करण्याचे आवाहन रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केले होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी व परिसरात शेतकरी,कार्यकर्ते यांनी हातात मोदी सरकारचे अभिनंदन करणारे फलक घेऊन घराच्या अंगणात विजयोत्सव साजरा केला.यावेळी रयत क्रांती संघटनेचे माढा तालुका प्रसिद्धी उपप्रमुख अमर पवार,प्रशांत नवले,बालाजी माळी,निखिल दळवी,शरद पवार,भीमराव जाधव,नागप्पा उन्ने आदीजन उपस्थित होते.