औरंगाबाद दि २५ :- वैजापुर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढत असल्याने या साखळीला तोडण्यासाठी वैजापुर तालुक्यात वैद्यकीय अधिकारी, राजकिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सफाई कामगार, पत्रकार मंडळी अथक परिश्रम घेत आहे. वैजापुर शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोना रूग्ण संख्या वाढु नये यासाठी ज्यांचा जनसंपर्क जास्तीत जास्त आहे अश्या सर्व नागरिकांनी रॅपिड टेस्ट करुन घ्यावी ही रॅपिड टेस्टिंग खुप महत्वाची तसेच खुप सोपी आहे. यामुळे आपण स्वतःची व कुटुंबाची काळजी वेळीच घेऊ शकतो. टेस्ट साठी भीती बाळगू नका कोरोना तुमच्या समोर काहीच नाही असं समजा, पण काळजी मात्र घ्यावी लागेल. ज्यांचा जनसंपर्क जास्त आहे त्यांनी स्वतः पुढे येऊन एकदा टेस्ट करावी. कारण तुम्ही सुरक्षित तर घर सुरक्षित, परिसर सुरक्षित, गाव सुरक्षित ,आपले शहर सुरक्षित. मला काही झालं नाही, मला कोणतेच लक्षण जाणवत नाही. याचा अर्थ असा नाही की मला कोरोना नाही कदाचित ते अँटीजन माझ्यात असतील.
माझी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल म्हणून मला काही जाणवत नाही पण माझा संपर्क ज्यांच्याशी येतो त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. कुटुंबाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या शहरासाठी स्वतः पुढे येऊन टेस्ट करून घ्यावी. मी स्वतः टेस्ट केली आहे आता तुमची वेळ आहे एक योग्य भूमिका घेण्याची. चला तर मग
प्रशासनाला सहकार्य करूया, कोरोनाला हरवुया. असे आवाहन पत्रकार दिपक बरकासे यांनी केले. यावेळी वैजापुरचे तहसीलदार निखिल धुळंधर, डॉक्टर गजानन टारपे, नगरसेवक दशरथ बनकर, राजेश गायकवाड, दिनेश राजपूत, वैजापुर पोलिस स्टेशनचे पीआय अनंत कुलकर्णी इत्यादी पत्रकार दिपक बरकासे यांच्या रॅपिड टेस्टिंग चे साक्षीदार बनले.
वैजापुर प्रतिनिधि :- गणेश ढेंबरे