• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

…अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिरात प्रवेश करू, राज ठाकरेंचा सरकारला इशारा.

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/09/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि ०४ : – राज्य शासनाने नुकतीच अनलॉक 4 ची घोषणा केली. मात्र, अद्याप मंदिर उघडण्याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय झाला नाही. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. सरकारने मंदिर उघण्यासाठी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरण शिथिल करणे हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे, की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरू असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाही? असा सवाल करत राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरू आहेत. मॉल्स उघडले, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली आणि या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा सवालदेखील राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही देखील समर्थन केलं होतं. आज जेव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असताना नेमकं महाराष्ट्रातच मंदिरं का बंद ठेवली जात आहेत? मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते, तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी असू द्या, अशी सूचनादेखील राज ठाकरे यांनी केली आहे.लॉकडाऊनच्या काळात आषाढीची वारी, गोपाळकाल्याचा उत्सव, गणेशोत्सव साजरा करताना राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचे सामंजस्य दाखवले आहे. सरकारच्या आदेशांचे अत्यंत समजूतदारपणाने पालन केले आहे. त्यामुळे उद्या मंदिरं उघडली, तर या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल याची मला खात्री आहे, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.मंदिरं सुरू करणं म्हणजे निव्वळ काही भक्तांपुरता हा विषय मर्यादित नाही. इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो याचा सरकार विचार करणार आहे की नाही? मध्यंतरी माझ्याकडे त्र्यंब्यकेश्वर मंदिराचे पुजारी आले होते, त्यांनी हीच व्यथा माझ्याकडे मांडली. एका मंदिरावर त्या गावाची, त्या शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते ती अर्थव्यवस्थाच कोलमडणार असेल तर त्यांनी साकडं घालायचं कोणाकडे?गेले ५ महिने सगळं अर्थकारण ठप्प आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय पार बुडालेत. त्यामुळे आतातरी सरकारने निर्बंध शिथिल करून, सार्वजनिक वाहुतकीचं नीट नियोजन करून या अर्थकारणाला धुगधुगी द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. या लोकांनी सरकारकडे विनंत्या, आर्जव केली, टाहो फोडला. पण सरकार स्वतःच्या धुंदीत तल्लीन झालंय. त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ या अंतिम श्रद्धेतून त्यांना त्यांच्या ईश्वराला साकडं घालायचं आहे. देवा या अस्मानी, सुलतानी संकटातून सोडव, असं आर्जव करायचं आहे आणि म्हणूनच सरकारने देव आणि त्याचे भक्त ह्यांची ताटातूट करण्याचा फंदात पडू नये, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Previous Post

टॉपलेस फोटो तुझ्या वडिलांना व पतीला दाखवीन असे ब्लॅकमेलिंग करून व मानसिक छळ करून एका तरुणीवर करत होता बलात्कार

Next Post

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कामात ऐतिहासिक बौद्ध लेणी जमीनदोस्त पँथर ऑफ सम्यक योद्धा सह पक्ष व संघटना आक्रमक

Next Post

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कामात ऐतिहासिक बौद्ध लेणी जमीनदोस्त पँथर ऑफ सम्यक योद्धा सह पक्ष व संघटना आक्रमक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist