भांडार दि २९ :-प्रतिनिधी -सध्या देशात सर्वत्र लॉकडाउन -ची परिस्थिती असून आशा परिस्थितीत सरकारने विद्यार्थ्यांना करीता ऑनलाईन अभ्यासक्रम ची पद्धत सुरू केली आहे . ही विध्यार्थ्यांना हानिकारक आहे . असे मत कुमारी संजना संजीव भांबोरे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे. संजना भांबोरे पुढे म्हणाल्या की जितका विध्यार्थी शाळेत किंवा कॉलेज मध्ये स्वतःलाचे लक्ष केंद्रित करून शिकू शकतो तो ऑनलाईन क्लास मध्ये आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही .मोबाईल मुळे डोळ्यांवर आणि डोक्यावर खुप परिणाम होत असताना जाणवत आहे .ऑनलाईन क्लास मुळे करत असताना विध्यार्थी स्वतःला जास्त वेळ बसवू शकत नाही त्याची बसण्याची क्षमता फक्त सरासरी २ तास असू शकते काही भागात तर इंटरनेट चालत नाही मग अशा विद्यार्थ्यांना मग क्लास कसा करायचा समाजातील जे काही गोरगरीब घरचे गरजू विध्यार्थी असतात त्यांनी कसे ऑनलाईन शिक्षण घ्याच कसे तर अशा विध्यार्थीना शासनाने मोबाईल ची सोय करून द्यावी व सोबतच इंटरनेट ची पण सुविधा उपलब्ध करून द्यावी असे मत संजना भांबोरे या विद्यार्थिनीने ऑनलाईन शिक्षणा मुळे किती प्रमाणात शिक्षणावर परिणाम होत आहे हे स्पष्ट करून दिले आहे.
औसा ता. लातूर जिल्हा :-लक्ष्मण कांबळे