• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भारत बंद’चे कारस्थान महाराष्ट्रात फसले भाजपा कडून शेतकऱ्यांचे अभिनंदन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/09/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.२९ :- केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजकीय हेतूने पुकारलेल्या भारत बंदचे आवाहन धुडकावून महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेने केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त केल्याबद्दल भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत. केंद्राचे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याच्या अपप्रचारास चोख उत्तर देऊन या कायद्यांविरोधातील राजकीय कारस्थान मोडून काढले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.डॉ. बोंडे यांनी पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबच्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या राजकीय आंदोलनास महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा पाठिंबा नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. केंद्राच्या कायद्याशी सुसंगत असे कृषी कायदे महाराष्ट्रात अस्तित्वात असून त्याने शेतकऱ्यांचे हितरक्षणच होत असल्याचा अनुभव शेतकरी घेत असल्याने या आंदोलनांचा फोलपणा शेतकऱ्याने ओळखला आहे. त्यामुळेच या कायद्यांविरोधातील भारत बंदच्या बेगडी आवाहनास विरोध करून व बंदचा फज्जा उडवून महाराष्ट्रातील शेतकऱ्याने व जनतेने केंद्र सरकारवरील विश्वासाची ग्वाही दिली आहे.शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या कायद्यांच्या संदर्भात सातत्याने दुटप्पी भूमिका घेतली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना बंधनमुक्त करा असे म्हणायचे आणि दुसरीकडे याच हेतूने तयार केलेल्या मोदी सरकारच्या कायद्यांना विरोध करायचा हा शरद पवारांचा दुतोंडीपणा शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. शेतकऱ्याची पिळवणूक करून सहकाराच्या नावाखाली निर्माण झालेल्या आर्थिक साम्राज्यास संरक्षण देणाऱ्या या नेत्यांवर जनतेचा विश्वास राहिला नसल्यामुळेच आज महाराष्ट्रातील शेतकरी केंद्रातील मोदी सरकारच्या पाठीशी एकवटला आहे, असे डॉ. बोंडे यांनी पत्रकात म्हटले आहे.या कायद्यांच्या विरोधातील भारत बंद आंदोलनास महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीने पाठिंबा दिला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही आंदोलनात उतरले होते. मात्र, राज्यात या आंदोलनाचा फज्जा उडाल्याने सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाचा मुखवटा उघड झाला असून सामान्य जनता सरकारसोबत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. शेतकरी हिताच्या विरोधातील कोणत्याच राजकीय कारवाया आता यशस्वी ठरणार नाहीत हेच या फसलेल्या आंदोलनाने दाखवून दिले आहे, असा टोलाही डॉ. बोंडे यांनी मारला.

      

Previous Post

काटेवाडीतील महिलेला पुण्यात मुलगा,मुलगी,सुनेने घरातून केले बेदखल

Next Post

जबरदस्तीने धर्मांतराच्या विरोधात मुस्लीम राष्ट्रीय मंच आक्रमक भूमिका घेणार : अली दारूवाला

Next Post

जबरदस्तीने धर्मांतराच्या विरोधात मुस्लीम राष्ट्रीय मंच आक्रमक भूमिका घेणार : अली दारूवाला

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist