• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आम्ही चालू पुढे वारसा घाटकोपरच्या गौरीपुत्रांचे रौप्यमहोत्सवी वर्ष मोठ्या जल्लोषात साजरे या वर्षीचे महालाची प्रतिकृतीचे आकर्षण

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/09/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि, १२ : – गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. संपूर्ण जगभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विद्येची आणि बुद्धीची देवता विघ्नहर्ता सर्वाच्या दुःखाचे निवारण करत असतो. लोकमान्य टिळकांनी चालू केलेला गणेशोत्सव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहतोचला आहे. घाटकोपर पारसीवाडी येथील जय महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. स्वर्गीय कार्यसम्राट नगरसेवक पा.रा. कदम यांनी १९७० साली प्रथम गणेशोत्सव चालू केला. आणि पाहाता पाहाता हा गणेशोत्सवाचे रूपांतर एका मोठ्या वटवृक्षात झाले. जय महाराष्ट्र गणेशोत्सव सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी साजरे करते. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेत असते तसेच गणपती उत्सवात रोज भक्तिमय वातावरणात हरी भजन, कीर्तनचा कार्यक्रम होतो. कीर्तन क्षेत्रात नामवंत कीर्तनकार कीर्तन करत असतात. आणि हे फक्त गणेशोत्सव पुरते मर्यादित नसून रोज मंदिरात हरिपाठ नियमित घेतला जातो. तसेच मंदिरात काकड आरती सोहोळ्याचे आयोजन केले जाते व शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महिला वर्गासाठी हळदी कुंकवाचे देखील आयोजन केले जाते. या वर्षी निसर्ग कोपला आणि निसर्गाने राज्यात धो धो करत पावसाने थैमान घातले. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अक्षरश होत्याचे नव्हते झाले. लोकांचे संसार मोडले गेले लोक बेघर झाले. पण अश्या लोकांसाठी जय महाराष्ट्र गणेश मैदान यांनी आपल्याला शक्य आहे तेवढी प्रामाणिक मदत करण्याचा प्रयत्न केला.
दहीहंडी असो, श्रीकृष्ण जन्म, नवरात्री उत्सव, गुढी पाडवा, रंगपंचमी असे अनेक उपक्रम मंडळ राबवत असते.ऐका मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे सर्व ऐकामेकच्या सुख दुःखात सामील होतात.
थोडक्यात माहिती स्वर्गीय पा.रा.कदम
“मरावे पण किर्ती रुपी उरावे” या म्हणी प्रमाणे स्वर्गीय पा.रा.कदम साहेबाने आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणीने समाजात खूप समाजोपयोगी कामे त्यांनी केले अनेक लोकांच्या हाताला कामे दिली. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी जय महाराष्ट्र गणेश मैदान शाळा चालू केली. लहान मुलांना खेळण्यासाठी जय महाराष्ट्र गणेश मैदान उपलब्ध केले. जेथे असंख्य लहान चिमुरडे मुले आज ही खेळाचा आस्वाद घेतात. लोकांना देवधर्म आध्यात्मिक ओढ निर्माण व्हावी या करिता विठ्ठल रुख्मिनी अंबिका मंदिर निर्माण केले. त्या मंदिरामध्ये नित्य नियमाने हरिपाठ घेतला जातो तसेच दरवर्षी काकड भजन सोहळा देखील घेतला जातो.झोपडपट्टीत राहणार्या गरीब जनतेसाठी आरोग्य केंद्राची निर्मिती केली. आज ही असंख्य लोक आपला उपचार आरोग्य केंद्रात घेतात. स्त्रीयांना समृध्द बनवण्यासाठी स्री बाल शक्ति केंद्र स्थापन केले. समाजकल्याण केंद्र उभारले मुक्ताबाई स्मशानभूमीची निर्मिती केली. बस सुविधा, अनेक रस्ते बनविले
मुंबई महानगरपालिकेत कुठेच नसणारे डबल मजल्याचे संडास बनविणारे ते पाहिले नगरसेवक आहेत. शिक्षण कमी असून ही ही वास्तू उभारणारे शिल्पकार असणारे स्वर्गीय पा.रा.कदम साहेबाचे आपणास त्यांच्या चातुर्य बुद्धीचे दर्शन होते. समाजात ते नेहमी एकोप्याने राहत असत त्यामुळे त्यांना समाजाचे प्रश्न महित होते.त्यामुळे ते प्रश्न चुटकीसरशी सोडवत असत. समाजात एकोपा निर्माण व्हावा या उद्देशाने त्यांनी जय महाराष्ट्र गणेश मैदान गणेशोत्सव चालू केला.आणि त्यांच्या मागे त्यांचें जावई विजय शिंदे साहेब अणि आशाताई शिंदे मोठ्या जिद्दीने हा वारसा चालवत आहेत .’ आम्ही पुढे चालू वारसा ‘या वर्षी हे गणेशोत्सवाचे ५० वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या वर्षी मंडळाने राजा महाराजा जश्या महालात राहत होते तश्या महालाची निर्मिती येथे साकारली आहे. मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळाचे सभासद आणि कार्यकर्ते मोठय़ा जिद्दीने आणि चिकाटीने काम केले .

Previous Post

पुणे शहरात वेश्याव्यवसाय करणा-या वर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

Next Post

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढविली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढविली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist