लातर दि,०५ :-प्रतिनिधी,महात्मा राजा रावण हे अत्यंत समृध्द संस्कृतीच्या वैभवशाली वारशाचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे.महात्मा राजा रावण तज्ञ शिल्पकार,राजनीति तज्ञ,शिल्पकार,नितीतज्ञ,आयुर्वेदिक,विवेकवादी,उत्कृष्ट रचनाकार,समताधिष्ठीत समाजव्यवस्थेचा उद्गगाता.न्यायप्रिय राजा अशा अनेक गुणांचा आविष्कार करणारा महत्तम राजा होता.अशा महान राजाला इथल्या षडयंञकारी व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही.
वास्तविक राजा रावणासारखा योध्दा झाला नाही.
तामिळनाडूमध्ये राजा रावणाची ३५२ मंदिरे आहेत.सर्वात मोठी मुर्ती हि मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे,महाराष्ट्रात अमरावती जिल्यात मेळघाट,छत्तीसगढ़,मध्यप्रदेश,झारखंड येथे राजा रावणाची पूजा केली जाते.राजा रावण हे आदिम संस्कृतीचे श्रध्दास्थान आहे.परंतु आदिवासींच्या या समताधिष्ठीत समाज व्यवस्थेचा उदगाता असलेल्या न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपुर्वक निर्माण करण्यात आली आहे.त्यामुळे देशातील आदिवासी समाजासह जागृत झालेल्या जनतेच्या भावना दुखावल्या जातात.शिवाय या दहन प्रथेमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा -हास होत आहे.
देशात आणि राज्यात अनेक कालबाह्य वाईट प्रथापरंपरा बंद करण्यात आल्या. सतीची चाल यापूर्वीच बंद झाली असून विधवांना पुनर्विवाह करण्यास देखील परवानगी मिळालेली आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यात अंधश्रध्दा निर्मूलन कायदा देखील अस्तित्वात आला आहे.महाराष्ट्राने पर्यावरणाचा -हास होतो म्हणून अनेक कायदे केले,असून. डीजे वाजविण्यावर बंदी आणण्यास आली आहे.सार्वजनिक सभेतील स्पीकर व भोंग्यांच्या आवाजावर नियञंण आणले आहे.मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर देखील बंदी घालण्यात आली असून प्लास्टिक पिशव्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे सम्राट अशोक विजयादशमी म्हणजे दस-याच्या दिवशी रावण दहन करीत असताना राजा रावणाच्या भल्या मोठ्या पुतळ्याच्या बीभत्स स्वरूप देऊन त्यात मोठे आवाजाचे फटाके भरण्यात येतात त्यामुळे मोठमोठे आवाज होऊन प्रदूषण वाढते आहेत याचा ञास संबधित विभागातील जनतेला होतो.त्यामुळे राज्य सरकारने राजा रावण दहण करण्यास परवानगी देण्यात येवू नये .ही प्रथा बंदच करण्यात यावी.
या दिवशी राजा रावण दहनाऐवजी वाईट प्रथा परंपरा जातीयता,कुपोषण, भ्रष्टाचार व अनीतीचे दहन करण्यात यावे .रावण दहन करण्यास कुणी प्रयत्न केल्यास त्याची जनजागृती करावी व अशा,आयोजकानां रावण दहणाची परवानगी देण्यात येऊ नये माञ तरीही प्रथेच्या नावाखाली कुणी जर असा प्रकार केल्यास आदिवासी संघटना व एकंदरीत समाजाच्या तीव्र भावना आहेत.त्यामुळे जी मंडळी रावण दहण करतील अशा लोकांविरूध्द भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३,१५३(अ),२९५,२९८,
मुबंई पोलीस अँक्ट १३१,१३४,१३५ नुसार फौजदारी गुन्हां दाखल करण्यात यावा.राजा रावण याचा शालेय अभ्यास क्रमात खरा इतिहास समावेश करण्यात यावा ,तसेच ही अनिष्ठ प्रथा त्वरीत बंद करण्यात यावी. असें निवेदन जिल्हाधिकारी व लातूर पोलीस अधीक्षक याना देण्यात आले निवेदनावर
भिम आर्मी चे महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे जिल्हा प्रमुख विलास चक्रे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे रेणापूर शहर अध्यक्ष धोंडीराम चक्रे व लातूर शहर अध्यक्ष बबलू गवळे आदी भिम आर्मी च्या कार्यकर्त्यांनी निवेदनावर स्वाक्षरी आहेत