श्रीगोंदा दि १९ :- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरगावच्या शिवारातील नदीच्या पात्रात अनाधिकृतपणे, विनापरवाना चोरून वाळू वाहतूक करणाऱ्यां ट्रक वर बेलवंडी पोलिसांनी रविवार दि.१९ रोजी सकाळी सापळा लाऊन छापा टाकून सुमारे ९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाळू वाहतूक करणारे ट्रक चालक-मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रविवार दि. १९ रोजी सकाळी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे काही इसम अवैध वाळू उपसा करून ट्रकच्या सहाय्याने वाहतूक करत आहेत. अशी माहिती मिळताच पो. नि.अरविंद माने, बेलवंडी पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी जाऊन वाळू वाहतूक होत असल्याची खात्री करून घेतली. खात्री झाल्यानंतर त्यांनी सापळा रचून वाळू वाहतूक करत असलेली ९ लाख रुपये किमतीची ट्रक क्रमांक एम.एच.१२.एफ.झेड. ४७३५ व त्यातील२ ब्रास अवैध उपसा केलेली ३० हजार रुपये किमतीची वाळू जागीच पकडले. पकडलेला ट्रक व त्यांतील वाळूसह पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आले असून. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल दादासाहेब क्षीरसागर यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून. दादाराव रामकिसन जाधव रा. हनुमंत वाडी, आळंदी व सागर वाळके रा. उखलगाव, ता. श्रीगोंदा यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपधिक्षक कर्जत संजय सातव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.फौ.गवळी बी. के. पो.ह.मधुकर सुरवसे, संभाजी शिंदे, पो.ना. झावरे, पो.कॉ. देशमुख, पो. कॉ.ज्ञानेश्वर पठारे, पो. काँ. बारवकर यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी : योगेश चंदन