मुंबई दि २९ : – आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे. बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे. कधी पाऊस पडतो तर कधी पाऊस पडत नाही. तरी आमचा शेतकरी खूप मेहनत करून शेती फुलवत असतो. पण कधी तर हातातोंडाशी आलेल्या गास सुद्धा हे असमानी संकट त्याचा पासून हिरावून घेते. तरी तो ठाम उभा राहतो अश्यातच नाशिक जिल्ह्यातील दत्ता राम पाटील हे मदतीसाठी धावून आले आहेत
: देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलं आहे. मात्र यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. मात्र त्याचवेळी अनेक मदतीचे हातही समोर आले आहेत. नाशिकचा एक तरुण शेतकरी मजुरांच्या मदतीसाठी धावून आला आहे. दत्ता राम पाटील असं या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने आपल्या 3 एकर जमिनीतील 1 एकरातील गव्हाचे गरजूंना वाटप केले आहे. सकाळी त्याच्याजवळ काही मजूर मदत मागण्यासाठी आले होते. हाताला काही काम नसल्याने घर कसं चालवायचं, काय खायचं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.दत्ता पाटील म्हणाले आम्हाला आमच्या आई वडीलांनी शिकवण दिली आहे आम्ही एक भाकर खात असलो आणि कोणी भुकेला आला तर त्याला अर्धी द्यायची
मुंबई प्रतिनिधी :- बाळु राऊत