टेंभुर्णी दि ०६ :- प्रतिनिधी संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असुन संपूर्ण देशात कोरोना वायरस पसरत असल्याने संपूर्ण भारतात त्याची दक्षता आणि नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून १४४ कलम लागू करण्यात आली आहे. कोरोना आजार होऊ नये म्हणून संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिनांक ०५/०४/२०२० ला रात्री ९.०० वाजता सर्व नागरिकांनी घरी सुरक्षित राहून सर्व लाईट बंद करून अंधारातून उजेडात जाण्यासाठी आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला टेंभुर्णी शहरात रात्रौ ०९ वाजता टेंभुर्णी पोलिसस्टेशनसहीत टिळकरोड,महादेव गल्ली,चांदनीचौक,भुईगल्ली,देशमुख गल्ली ,भवानी नगर,व टेंभुर्णी पोलिसठाण्यात तसेच टेंभुर्णी शहरातील अत्यावश्यक मध्ये मोडणारी मेडीकल,दवाखाने सहीत संपूर्ण लाईट बंद करून ०९ वाजुन ०९ मिनटांनी टेंभुर्णी शहरवासीयांनी येथील नागरिक आपल्या दारात, बालकनीत,घरात व देवघरात राहूनच दिवा,मेणबत्ती, टार्च सुरु करुन, फटाक्या वाजऊन आतिषबाजी करत एक दिवा एकतेचा हा संदेश दिला. दिवा, मेणबत्ती, टार्चच्या रोषणाईने संपूर्ण टेंभुर्णी शहर उजळून दिसत असली तरी काही भागात याचा प्रभाव काहीच दिसुन न आल्याने टेंभुर्णी शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला समिश्र प्रतिसाद नागरिकांनी दिला.
टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप