मुंबई दि १२ : -कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध माध्यामातून प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढती संख्या लक्षात घेता. महाराष्ट्रात लॉक डाऊन देखील 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आले आहे.
परंतु महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे कोरोना रुग्णाच्या आकडेवारी नुसार रेड, ऑरेंज, ग्रीन असे झोन तयार केले आहेत
त्यामुळे प्रशासनाला जास्तीत जास्त लक्ष्य केंद्रित करण्यास मदत होईल आणि तात्काळ त्याच्यावर उपाययोजना करणे देखील सोयीचे होणार आहे तसेच चाचण्या करणं प्रशासनाला लवकर शक्य होईल. बनविलेले झोन हाताळण्यास देखील सोपं होणार आहे.
ज्या जिल्हांमध्ये 15 पेक्षा अधिक रूग्ण असतील ते जिल्हे रेड झोनमध्ये असतील. 15 पेक्षा कमी कोरोनाबाधितांचा समावेळ ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाहीये, असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.
रुग्णसंख्येनुसार राज्यातील जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आलं आहे. ग्रीन झोनमध्ये धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीचा समावेश आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी