जालना दि १९ :- प्रतिनिधी : अंबड तालुक्यातील आलमगाव परिसरात चार ते पाच दिवसा पासुन सतत रिम झिंम पाऊस पडत आहे. यामुळे मुग, उडीद, कापुस, भुईमुग, सोयाबीन इतर सर्व पिकांची पाने, शेंगा पिवळी पडून खराब होत आहे,
पिकांना आलेली फुले, पाते गळुन खाली पडत आहे या सतत धार पडत असलेल्या पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झालेले आहे तर काही ठिकाणी शेतात जास्त पाणी साचल्यामुळे शेतातील उभे पिक पाण्यामुळे सडत आहे यंदा खरिप हंगामत पाऊस चांगला असल्यामुळे शेतक-यांमध्ये समाधन होते पण चार – पाच दिवसा पासुन चालु असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी राजा अडचणीत आला आहे.आता खरिप हंगाम वाया जाणारा ही भिती शेतक-यांना भेडसावत आहे. शेतकरी फार खचून हवालदिल झाला आहे, तरी शासनाने पंचनामा करून मदत झाहीर करावी अशी विनंती शेतकरी व ग्रामस्त कडू होत आहे
जालना प्रतिनिधी :- महेश प्रल्हाद बर्गे