बामनीफाटा दि २३ ( प्रतिनिधी ) :- हदगाव तालूक्यातिल शीवदरा ,जगापुर,पांगरि निमटोक पीपंरखेड,करमोडी,बामणि , पोतलि , गारगोटि , कवाना सह बामनीफाटा परिसरातच मागील दहा ते पंधरा दिवसापासून सतत झालेल्या पावसामुळे शेतकर्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे या पावसामुळे शेतात उगवलेले पांढरे सोने कापूस ज्वारी , मूग , सोयाबीन याची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तरीपण पिकाचे उत्पादन ७० ते ८० टक्के घटल्याने लावलेले खर्च निघणे कठीण आहे.ऐनवेळि मोसमात निसर्गाच्या संकटामुळे बळीराजा पुरता अडचणीत आला असून मुगाला मोड फुटले व मुगाच्या शेंगा मधून वास सुटत असल्याचे दिसून येत आहे तर सोयाबीन पिवळे पडून बुरशी धरू लागले शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे . अगोदर बळीराजा खरिपात झालेल्या अल्प पावसामुळे हैराण झाला असताना उरलेली पिके तरी साथ देतील या आशेने कामाला लागला होता आणि पिकाला पाहून शेतकरी खुश होता पण कालमानाने निसर्गाने असे कोपले कि जसे दहा ते पंदरा दिवसाचि झड पावसाने लावलि दहा ते पंधरा दिवसाच्या सतत धार पावसाने बळीराजाला चिंतेत टाकले आणि हातात आलेला मूगनष्ट केला आहे आणि सर्व पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे पांगरी येथील शेतकर्यानि नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे . या निवेदनावर शेतकऱ्याची सही गावातील सरपंच शिवाजीराव मस्के , पोलीस पाटील मनोजआडे , अंकुश राठोड , गंगाराम तोडकर , विकास राठोड आदि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
नांदेड प्रतिनिधी संदीप तुपकरी