पुणे दि २३ :-विद्यापीठांना बांबू मिशन पूर्ण करण्यासाठी मोफत बांबू बियाणे व मार्गदर्शन करण्यास हरित मित्र परिवार सज्ज आहे, अशी माहिती परिवाराचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांनी दिली.नुकतेच पणजी येथे बांबू लागवड मोहीम या विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी षयांनी केले होते. शेतकरी व आदिवासींच्या आर्थिक प्रगतीसाठी विद्यापीठांनी बांबू लागवड मोहिम राबवावी असे आवाहन केले होते. या आवाहनास हरित मित्रने सक्रिय पाठींबा दिला आहे.आज पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बरोबरच नागपूर व कोल्हापूर विद्यापीठात ही मोहीम हरित मित्र तर्फे यशस्वीपणे राबविली जात आहे. देशभरातील विद्यापिठानी संपर्क साधल्यास त्यांना मोफत बियाणे व मार्गदर्शन करण्यास तयार आहे, असे घागरे यांनी नमूद केले.