पुणे दि०६ :- कोथरुड येथील विजयालक्ष्मी अपार्टमेंट रामबाग काॅलनी शिवराय प्रतिष्ठान काॅलेजच्या समोर राहणा-या भाविका विलास झोरे ( वय ३४ ) हिचा सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तीच्या मृत्यूला पती जबाबदार असून तिचा पती विलास तुकाराम झोरे यांच्यावर भाविका झोरे च्या खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तीच्या नातेवाईकांनी केली आहे तर समाजातील पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेत संगमेश्वर ची माहेरवाशीण असलेल्या भाविका झोरे हिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पतीला आणि इतर आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी विनंती केली असता आमदार शेखर निकम यांनी आपल्या संगमेश्वर तालुक्यातील बहीणीला न्याय मिळवून देण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे. भाविका झोरे हिच्या आईने कोथरुड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भा.दं.वि ३०६, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असला तरी भाविका झोरे हिला मारहाण केली गेल्याने त्यातच तीचा मृत्यू झाला आहे त्यामुळे तिच्या पतीवर भा.दं.वि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी समाजातून होत आहे कोथरुड पोलिसांची सुरुवातीला तपासाची गती धिम्या गतीने सुरु होती समाजातील पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कोथरूड पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करावी या मागणीला जोर धरत आहे.
भाविका पिंगळे ही मुळची नायरी ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथील रहिवासी असून तीचा १२ डिसेंबर २०१० रोजी विलास तुकाराम झोरे यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह करण्यात आला होता लग्नानंतर फक्त सहा महीने संसार सुखी केल्यानंतर पतीकडून वारंवार अपमानास्पद वागणूक देण्याची सुरुवात झाली. भाविका आणि विलास यांना तीन मुले आहेत भाविकाच्या आईने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार २०११ पासून भाविका हिचा कायम छळ होत होता तीचा वारंवार मानसिक छळ करण्यात येत होता छळाबाबत भाविका हिने आईला फोनवरुन सांगितले होते मात्र तीने या छळाबाबत घरच्या इतरांना न सांगण्याची अट घातल्याने आईने तीच्या भावांना याबद्दल काही सांगीतले नव्हते . भाविका हिचा पती सुधारेल आणि त्यांचा संसार सुखाचा होईल या आशेवर तीची आई होती मात्र
भाविकाच्या छळात वाढच होत गेली. भाविकाला जेवण जमत नाही , काही काम नको असे वारंवार हिणवले जात असल्याचे आईने सांगितले आहे. भाविका वर्षातून एकदा दिवाळी सणात माहेरी येत असे ती माहेरी आली म्हणून देखील तिचा छळ केल्याचे आई सांगितले. १९ डिसेंबर २०२० ला भाविका बहीणीची मुलगी मयुरी हिच्या लग्नासाठी देवरुख रत्नागिरी येथे आली होती त्या दरम्यान तीचा छळ झाला मुलांचे कारण देत पतीकडून शिवीगाळ करण्यात आली होती पतीने त्या लग्नातच भाविकाला लग्न सोडून पुण्याला जाण्याची धमकी दिली होती मात्र माहेरच्या मंडळींनी समजूत घालत प्रकरण शांत केले होते. मात्र ही शांतता फार काळ टिकू शकली नाही खुप दिवसांच्या छळवणूकीनंतर अखेर भाविकाचा ३ फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला भाविकावर कोथरुड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.