नागपूर दि २७ :- कोरोना वाढत असून मंगल कार्यालयांना ५० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देऊ नये, या बाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे तरीही अनेकजण दंड भरून लग्न समारंभ उरकत असल्याचे आढळून आल्याने आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नियम पायदळी तुडविणारे मंगल कार्यालयांना सील ठोकण्याचे निर्देश दिले. दरम्यान, महापालिकेने १४ मंगल कार्यालयांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख २३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला
कोरोना वाढत असून मंगल कार्यालयांना ५० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देऊ नये, याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.परंतु, आधीच लग्नाची तारीख ठरली असल्याने अनेकजण दंडाची तयारी ठेऊन समारंभ उरकत आहे. एवढेच नव्हे दोनशे लोक समारंभात उपस्थित राहत आहेत. काहींनी दंड भरण्याचीही तयारी ठेवली. परंतु, आता आयुक्तांनी कोरोना संदर्भातील नियम मोडणाऱ्या मंगल कार्यालये सील करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता मंगल कार्यालय, लॉन संचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. दरम्यान आज महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने १४ मंगल कार्यालये, लॉनवर कारवाई करून१ लाख २३ हजारांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.