पुणे दि १७ :- पुणे ग्रामीण एल.सी.बी. पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणातील दोघांना अटक केली.सागर उर्फ सोन्या जालिंधर सुर्यवंशी वय २९ वर्षे रा.केडगाव पिसेवस्ती ता.दौंड जि.पुणे,अमोल उर्फ लखन विलास देशमुख वय २९ वर्षे रा.खंडोबानगर ता.बारामती जि.पुणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांकडून यवत पोलिस ठाण्यातील गुन्ह्याबरोबरच २१पोलिस ठाण्यात जबरी चोरी तसेच विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या दोघा गुन्हेगारांनी दि.११मार्च रोजी वाखारी ता.दौंड गांवच्या हददीत कॅनॉलचे कच्चे रोडचे कडेला रमेश शामजी कुछाडीया वय ३६ वर्षे रा.कोपरखैरणे, नवी मुंबई यांचे गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन, उजवे मनगटावरील दोन तोळा वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, दोन सोन्याच्या अंगठया, एक मोबाईल, रोख रक्कम १५ हजार रुपये असा एकुण किं.रु. १,४५,०००रुपयांचा माल जबरदस्तीने काढून चोरून नेला. त्यावेळी कुछाडीया यांनी आरडाओरड केली असता तेथे रस्त्याने जाणारे लोक आल्याने दोघे आरोपी पळून गेले. व पोलिस ठाण्यात जबरी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात आला.पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना आज रोजी एल.सी.बी टिमला दोघे आरोपी पाटस, बारामती फाटा ता.दौड जि.पुणे येथे सोन्याच्या अंगठ्या विकण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्याची सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यानंतर त्यांची झाडा झडती घेतली असता त्यांचेकडे वाखारी येथील जबरी चोरीचे गुन्हयातील चोरलेल्या २ सोन्याच्या अंगठया, १ मोबाईल, रोख रक्कम ७००० रुपये तसेच गुन्हयात वापरलेली मोटरसायकल व इतर १ मोबाइल असा एकूण १,०२,०००रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तो जप्त केलेला आहे. या दोघा आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले असुन, या दोघांवर यापूर्वी २१ पोलिस ठाण्यांमध्येही जबरी चोरी तसेच विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे,पोसई रामेश्वर धोंडगे,पोहवा.महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम,पोहवा.सचिन गायकवाड,पोहवा. सुभाष राऊत,पो.ना.गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे