शिरूर, दि.०८:-आपण नेहमी पिक्चर मध्ये पाहत असतो मुलगा हरवलेला व सापडलेला तसेच काही, वास्तवात घडले आहे बिहार मधील माझीया चांददियर जिल्हा बलीया येथील यादव कुटुंबा बरोबर…
सविस्तर वृत्त असे आहे की रामलाल शहा यादव हा 2007 मध्ये सुदीश बाबा का मेला( यात्रा) या ठिकाणांवरून हरवला होता तो थोडा मतिमंद पण आहे, रामलाला घरच्यांनी भरपूर ठिकाणी पाहिले परंतु तो कुठेही सापडला नाही त्यानंतर काय रामलाल सापडेल का नाही ही आशा त्यांनी सोडून दिली होती.परंतु कामानिमित्त महाराष्ट्रात आलेल्या त्यांच्या तालुक्यातील व गावा शेजारी मुन्ना आलम यांची शिरूर तालुक्यातील आंबळे गावामध्ये भेट झाली व त्यानंतर आंबळे गावातील सामाजिक कार्यकर्ते विशाल घुंबरे यांच्यामार्फत रामलाल याच्या कुटुंबांना माहिती दिली, त्यानंतर रामलाल चे वडील व भाऊ आंबळे याठिकाणी आले व आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला ओळखले व ते खूश होऊन भाऊक झाले, व त्यांनी या वेळेस मुन्ना व विशाल घुंबरे व आंबळे गाव चे सरपंच सोमनाथआण्णा बेंद्रे यांचे मनापासून आभार मानले.आंबळे गावातील राजु फुलफगर यांच्याकडे रामलाल सात वर्षापासून काम करत होता.व ते रामलाल ला कोणीही नसल्यामुळे त्याचा चांगल्या प्रकारे संभाळ करत होते.यावेळी सरपंच सोमनाथआण्णा बेंद्रे यांनी या कुटुंबांची आंबळे गावामध्ये ग्रामपंचायत तर्फे स्वागत केले व त्यांचा येथेच पाहुणचार करून त्यांचा सत्कार केला, व ज्यांनी भेट घडून आणली असे मुन्ना आलब,मनीष ठाकुर यांचाही सत्कार केला.या कार्याची आंबळे गाव व शिरूर तालुक्यामध्ये कौतुकाची चर्चा चालू आहे.यावेळी सरपंच सोमनाथ बेंद्रे, उपसरपंच पुनम राजेंद्र बेंद्रे, राजेंद्र गौतम बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते विशाल घुंबरे, बापूसाहेब फुलफगर,चंद्रकांत माने,राजेंद्र फुलफगर,चेअरमन सुरेश बेंद्रे, इत्यादी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे