पुणे,दि.०८ :- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला मंजुरी तर मिळाली आहे पण गेली काही दिवस झाली तरी अद्याप प्रत्यक्षात कामाला काही सुरुवात नाही. औंध, बाणेर, पाषाण,चे नागरिकही या रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफिकला कंटाळले आहेत, परंतू हा मार्ग नियोजीत वेळेत पूर्ण होणार नाही. याच संदर्भात खासदार गिरीश बापट यांनी पी एम आर डी ए च्या कार्यालयाला भेट देत, नियोजीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी येत्या सात दिवसांत मेट्रोचे काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.खासदार गिरीश बापट यांनी आज पीएमआरडीएचे सीईओ डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामाबाबत चर्चा केली विलंब का होत आहे याची माहिती घेतली. याप्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनिता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नीलिमा खाडे, स्वप्नाली सायकर, कोथरूड भाजपा मंडल अध्यक्ष पुनीत जोशी उपस्थित होते.
बापट म्हणाले की हिंजवडी येथील आयटी पार्क पुणे व पिंपरी चिंचवड शहराला जोडणार्या हिंजवडी ते शिवाजीनगर प्रस्तावित मेट्रो मार्गाचे काम गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होणे शक्य नाही.आपल्याकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे.सदर मेट्रो नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास भविष्यकाळात त्यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल ही शक्यता नाकारता येत नाही. याचा नकळत आर्थिक भार हा पुणेकर जनतेला व शासनाला सोसावा लागणार आहे, ही बाब नक्कीच गंभीर आहे. सदर मार्ग सुरु होण्यास विलंब होत असल्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा झालेला आहे.
त्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. सदरचा मार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड मधील नागरिक व आयटी क्षेत्रात काम करणार्या असंख्य कर्मचार्यांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका देणारा असल्यामुळे सदर मार्गाचे काम ज्या ९८ % जागा ताब्यात आलेल्या आहेत, त्या ठिकाणी तातडीने सुरू करावे, तसेच ज्या उर्वरित शासनाच्या जागा ताब्यात आलेल्या नाही. त्या तातडीने ताब्यात घेणेबाबत प्रशासनाने लक्ष देवुन कार्यवाही करावी, जेणे करुन सदरचा प्रस्तावित मेट्रो मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
आता जर या साठी आपण पुढाकार नाही घेतला तर पुढे जावून खूप आजुन उशीर लागत जाणार आहे, त्या करिता आताच काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार बापटांनी दिला.