• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

एमटीडीसी चे जबाबदार पर्यटन- एक नवीन संकल्प

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/01/2022
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

अष्टाविनयाकांपासून ते पंढरपूर पर्यंत अनेक धार्मिक स्थळे, निसर्गाव्दारे वरदान लाभलेली संपदा, गडकिल्ले, ओसंडून वाहणारे धबधबे, नदया, सागरी किनारे, नागमोडी वळणे असलेले घाट, पारंपारिक संस्कृति, खादयसंस्कृति अशा विशिष्ठ वैशिष्ठयांमुळे आज महाराष्ट्रामध्ये देशभरातून नव्हे तर जगभरातून पर्यटकांचा राबता दिसता, पाउलखुणा दिसतात.
आज संपूर्ण जगभरात व भारत देशामध्ये आपल्याला एक उल्लेखनीय अशी संकल्पना राबताना दिसत आहे, ती संकल्पना म्हणजे जबाबदार पर्यटन!
पर्यटनाचे सकारात्मक परिणाम वाढवणेकरिता तसेच नकारात्मक परिणामांना आळा घालणेकरिता, ते कमी करणेकरिता एक साधा आणि वाखणण्याजोगा उपाय म्हणजे जबाबदार पर्यटन, जे आज संपूर्ण जगभरात पुष्कळ ठिकाणी स्विकारले गेले आहे. जबाबदार पर्यटन या संकल्पनेचा मुळात उददेश हाच आहे कि सर्व भागीदारांमध्ये जबाबदार पर्यटन स्विकारण्याच्या दृष्टीने जागृती निर्माण करणे . आजच्या स्पर्धात्मक युगात पर्यटन व्यवसाय खुप वाढीस लागला असून पर्यटनाला खुप चालना मिळाली आहे. दुर्दैवाने पर्यटन म्हणजे एखादया रिकाम्या जागेत दोन-चार चांगल्या सुविधा असलेल्या खोल्या बांधल्या, पर्यटकांच्या खाण्यापिण्याची सोय केली म्हणजे जबाबदारी संपली, अशी मानसिकता आहे. आणि सदर मानसिकता विश्वाचा एक अजबाबदार व्यक्ती असल्याचे दर्शविते. आपण ज्या भूतलावर वास करतो, त्या मातृसमान असलेल्या वसुंधरेचे जतन करणे, काळजी घेणे, इजा न पोहोचवणे हे आपले आदय कर्तव्य आहे, त्यातून एक जबाबदार नागरिक जन्म घेतो. जबाबदार पर्यटन ही संकल्पना काळाची गरज बनली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 47 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत दिनांक 20 जानेवारी 2022 पासून महामंडळाव्दारे अखत्यारित होत असलेल्या सर्व पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स तसेच अभ्यंगत केंद्रे इ.मध्ये जबाबदार पर्यटनाचे भविष्य, आवश्यकता, महत्व लक्षात घेवून जबाबदार पर्यटन संकल्पनेची पुरेपुर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सुचना सर्व कर्मचारी आणि पर्यटक निवासांसाठी महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक श्रीमती जयश्री भोज यांचेकडुन देण्यात आल्या आहेत.
महामंडळाच्या पर्यटक निवासे/उपहारगृहांमध्ये कार्यरत असणारे सर्व कर्मचारी वर्ग हे सदर पर्यटक निवासाच्या/उपहारगृहाच्या आसपासच्या परिसरातील आणि स्थानिक आहेत. स्थानिक कर्मचाऱ्यांना रोजगार आणि योग्य प्रशिक्षण देवून MTDC त्यांच्या आर्थिक कल्याणास समर्थन देते आणि यातून स्थानिक भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
पर्यावरणाप्रप्ती आपली जबाबदारी आहे कि आपल्या परिसरामध्ये होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावणे, स्वयंपकाघरात निर्माण होणारा कचरा (ओला आणि सुका) वेगळा करण्यात येतो. आणि तो कचरा ट्रकमध्ये वाहून नेणाऱ्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना देवून सरकारी मार्गदर्शक तत्वांनुसार त्याची विल्हेवाट लावण्यात येते. त्याच अनुषंगाने जबाबदार पर्यटन विचारात घेता पर्यावणाप्रती आपली जबाबदारी सशक्त असावी. आपल्या अखत्यारित येत असलेल्या पर्यटक निवासांमध्ये वेळोवळी स्वच्छता अभियान, प्लास्टिक प्रदुषण नियंत्रण, स्वच्छतेचे महत्व समजावून देणारे संदेश यांची पर्यटक निवसांमध्ये एक जबाबदार पर्यटक निवास व्यवस्थापक बनून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
ज्या पर्यटकांच्या जोरावर महामंडळ पर्यटकांना उत्तम प्रकारच्या सेवा देवून आर्थिकदृष्टया सक्षम आहे, त्या पर्यटकांची काळजी घेणे प्रथम कर्तव्य आहे. पर्यटक निवासाच्या परिसरात ठिकठिकाणी फलक लावणे, अतिथी पर्यटक निवासामध्ये दाखल झाल्यावर सुरवातीलाच पर्यावरण प्रेमी म्हणून Do’s And Don’ts बददल सांगण्यात येणार असुन राहण्याची सोय, चविष्टा जेवण एवढीच आदरातिथ्याची व्याख्या न ठरवता, त्याला सुरक्षित , जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाची जोड देण्यात येणार आहे..
या अनुषंगाने, प्रत्येक आठवडयात जबाबदार पर्यटनाचा विषय ठरवून देण्यात येईल. मपविमच्या सर्व पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स तसेच अभ्यंगत केंद्रे इ.मध्ये जबाबदार पर्यटन हि संकल्पना आल्या पर्यटक निवासंमध्ये राबवून पर्यटनाच्या दृष्टीकोनातून एक पाउल विकासाच्या दिशेने टाकून नवीन सुरवात करता येईल.
लाँड्री , लिनन, वातानुकुलित यंत्रणा, जनरेटर, विविध प्रकारच्या खरेदी तसेच शाश्वत साहित्ये आणि इतर बऱ्यास गोष्टींबददल प्रत्येक आठवडयाला आपणास जबाबदार पर्यटनाच्या दृष्टीने समजाविण्यात येतील.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे आज 30 पर्यटक निवासे, 29 उपहारगृहे तसेच बोट क्लब्स् इ.यांचे परिचलन करण्यात येत आहे. जबाबदार पर्यटनाचे भविष्य, आवश्यकता महत्व लक्षात घेता, महामंडळाच्या अखत्यारित येत असलेल्या पर्यटक निवास महाबळेश्वर येथील भूमिवर जबाबदार पर्यटन ही परियोजना चालविण्यात येत आहे. No Preservatives, No Additives, No Colors, No Artificial Flavors, No Ajinomoto या पाच मूल्यांची महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महामंडळाचे उप महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले.
महामंडळाच्या उपहारगृहांमध्ये स्थानिक खादयपदार्थांना प्रोत्साहन दिले जाणार असुन पर्यटकांचे मन मोहून टाकणारे स्थानिक खादयपदार्थ जसे की पिठले, उसळ, काळा मसाला असे खास पदार्थ पाहुण्यांना सुचविण्यात येणार असुन स्थानिक पाककृतीच्या चवींचा आणि विशिष्टतेचा आनंद पर्यटकांना देण्यात येणार आहे. यास अनुसरून प्रत्येक पर्यटक निवासात पुरेपुर विचार करून सदर मुल्ये प्रत्यक्षरित्या अंमलात आणणार असुन पर्यटकांचे आदरातिथ्य जबाबदार पर्यटन या संकल्पनेस अनुसरून MTDC ची पर्यटकांची मनामध्ये असलेली प्रतिभा अजुन उंचावणार आहोत.
महामंडळाने जबाबदार पर्यटनाच्या दिशेने यापुर्वीही पावले उचलली असली तरी त्याकरिता पर्यटकांच्याही अमुल्य योगदानाची आवश्यकता आहे. आपल्या मातृसमान असलेल्या वसुंधरेचे रक्षण करण्याचे एक महत्वपुर्ण काम आपल्या हातून घडणार आहे. त्याचप्रमाणे ही संकल्पना अंमलात आणली असता जबाबदार पर्यटन हे पर्यावणाशी निगडित असल्याकारणाने पर्यावरणाची हानी होणार नाही आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी आपण सुयोग्यरित्या पार पाडण्यास समर्थ ठरू, असे प्रतिपादन महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी केले आहे.

Previous Post

पुणे शहरातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण अखेर सापडला

Next Post

चतुर्श्रुंगी पोलिसांची ‘स्वर्णव’ कामगिरी मा.नगरसेवक सनी निम्हण यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Next Post

चतुर्श्रुंगी पोलिसांची 'स्वर्णव' कामगिरी मा.नगरसेवक सनी निम्हण यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist