मुंबई, दि. ५ :- मुंबई प्रतिनिधी बाळू राऊत पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.
पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, राज्यात पुढील दोन महिन्यात प्लास्टिक बंदी नव्वद टक्क्यांवर आणू. हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 200 यंत्रे राज्यात कार्यरत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता कळते. पुढील काळात कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याचे सेंद्रीय खत करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. याच कार्यक्रमात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत करुन पुढील काळात पर्यावरणावर अधिक काम करावे लागेल, असे सांगितले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्या हस्ते वसुंधरा पुरस्काराचे वितरण तसेच हवा गुणवत्ता अहवाल आणि ‘प्लास्टिक बंदीचे शिवधनुष्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार पर्यायी म्हणून मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील,
प्रारंभी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रविंद्रन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रधान सचिव अनिल डिग्गीकर उपस्थित होते.
मुंबई प्रतिनिधी बाळू राऊत