मुंबई दि २२ :- ‘कोरोना’विरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार. ज्या जनतेने आपल्या घरातून घंटानाद, थाळीनाद करून त्यांचे आभार व्यक्त केले, त्यांचेही आभार.
परंतु, लोकप्रतिनिधी आणि जनतेने रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन हा घंटानाद करणे अपेक्षित नाही. लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिध्दी देणे टाळण्याची गरज आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहचवत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की रस्त्यावर उतरून गर्दी करणे टाळावे. प्रसारमाध्यमांनीही अशा गर्दीला प्रसिध्दी, प्रोत्साहन देऊ नये..
– उपमुख्यमंत्रीअजित पवार