लोणावळा दि ०२ :- मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन एक्सप्रेस वे कडे जाणाऱ्या अंडा पॉईंट खंडाळा येथील तीव्र व धोकादायक वळणावर हा अपघात झाला आहे.पुण्याहून मुंबईकडे आयशर टेम्पो ट्रक क्रमांक MH 46 BB 1830 चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटला. या अपघातात मुंबईहून पुण्याकडे 1) MH 14 CV 0243 , 2) MH 14 FK 4097 , 3) MH 14 FH 5793 या मोटरसायकलवरील तळेगाव एमआयडीसी मध्ये काम करणारे ( मूळ रा. लातूर ) येणारे तीन दुचाकीवरील सहा दुचाकीस्वार लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असता भरधाव टेम्पो त्यांच्या अंगावर पलटला.भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. एक जण सुदैवाने बचावला आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व दुचाकीस्वार पर्यटनासाठी अलिबाग येथे गेले होते तेथून पुन्हा (तळेगाव) पुण्याकडे परतत असताना हा अपघात झाला.अपघाताच्या ठिकाणी बोरघाट महामार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी , अपघातग्रस्त मदतीकरिता स्वयंसेवी संस्थांचे सदस्य , IRB ची देवदूत टीम इत्यादी मदत कार्यात सहभागी होऊन ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढून तात्काळ खोपोली न.पा.चे दवाखान्यात रवाना केले आहेत, महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून खंडाळा महामार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहे.अपघातामध्ये प्रदीप प्रकाश चोळे (वय 38), अमोल बालाजी चिलमे (वय 29), नारायण राम गुंडाळे (वय 27), निवृत्ती राम गुंडाळे (वय 30), गोविंद नलवाड (वय 35) या पाच जणांचा मृत्यू झाला असून बालाजी हरिश्चंद्र भंडारी (वय 35) हे सुखरुप बचावले आहेत. वरील सर्व जण हे लातूरचे असून तळेगावात कामाकरिता राहत होते. याप्रकरणी खोपोली पोलीस व बोरघाट पोलीस अधिकचा तपास करत आहेत.