मुंबई दि ३० : – कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने दि २८ रोजी मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागात स्टेशन परिसरातील गरजू लोकांना सुमारे १ हजार अन्नाची पाकिटे वाटली.सर्व विभागांतील रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांची समर्पित पथके चोवीस तास कार्यरत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई आणि मुंबई सेंट्रल येथील आयआरसीटीसी बेस किचन मध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवण (डाळ खिचडी) तयार करीत आहेत. आरोग्यविषयक मानदंडांचे पालन करून सुमारे २ हजार फूड पॅकेट तयार केली जात आहेत आणि त्याचे वाणिज्यिक विभाग आणि आरपीएफमार्फत वितरित केले जात आहे.याव्यतिरिक्त, कॅटरिंग स्टॉल मालक, वाणिज्य विभाग कर्मचारी, आरपीएफ
कर्मचारी अन्न पॅकेट वितरणात वैयक्तिक योगदान देत आहेत. आजच सोलापूर विभागात १४० खाद्यपदार्थांचे पाकिटे, नागपूर १५० खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, पुणे विभाग १५० खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, मुंबई विभाग व भुसावळ जवळपास ३५० खाद्यान्न पाकिटे स्थानकांजवळील गरजू व गरीब लोकांना वाटण्यात आली आहेत.लातूर स्थानकात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ४५ जणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदानानंतर सुरक्षित अंतर, स्वच्छता यासारख्या खबरदारी घेण्यात आल्या.आहे