पुणे दि ०७ :- पुणे परिसरात एकाच दिवसात कोरोना बाधितांची संख्या ३६ नि वाढ झाली आहे. कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील काही परिसर पुणे आरटीओ ते गुलटेकडी हा भाग सिल करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे.
त्यात गंज पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ ते गुलतेकडीपर्यंतचा परिसर सिल करण्यात येणार आहे. त्या परिसरातून कोणाला ये- जा करण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे.
दरम्यान, या भागात राहत असलेल्या जनतेला सगळ्या जीवनावश्यक वस्तू तिथेच पुरवण्याची सोय करण्यात येणार आहे. एका दिवसात कोरोनाबधितांचा आकडा झटक्यात वाढल्याने पुणे महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.ही वाढ पुणे शहराच्या गुलटेकडी ते संगम ब्रीज आरटीओ कार्यालया दरम्यान आणि कोंढव्याच्या एका भागात अधिक असून हा भाग सील करण्यात येणार आहे. अशीच परिस्थिती राहील्यास टप्प्याटप्प्याने संपुर्ण पुणे शहर सील करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात गुलटेकडी ते आरटीओ पर्यंतचे सर्व रस्ते व अंतर्गत रस्ते बंद करण्यात येणार आहेत. नागरिकांनी घरातच राहून आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेर पडणार्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले, की शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. गुणाकार पद्धतीने हा संसर्ग होत असून गुलटेकडी ते आरटीओ कार्यालया दरम्यानच्या परिसरात शहरातील सर्वाधीक रुग्ण आढळले आहेत. तसेच कोंढव्यातील एका भागातही मरकजशी संबधितचांचे प्रमाण अधिक आहे. येथे आल्यानंतर ते ज्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. यामुळे गुलटेकडी ते आरटीओ कार्यालया दरम्यानच्या परिसरातील मध्यवर्ती पेठांचा व कोंढव्याचा गुगलवरून नकाशा तयार करण्यात आला आहे. या मॅपनुसार मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते १०० टक्के सील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या भागातील नागरिकांनी पुढील काही दिवस शक्यतो घराबाहेर पडू नये. किंबहुना घरामध्ये असतानाही मास्क वापरावा. हेल्थ गाईडलाईननुसार हात साबणाने स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा परिस्थिती बिघडल्यास टप्प्याटप्प्याने संपुर्ण शहर सील करावे लागेल, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.
ते म्हणाले, की साथीच्या दुसर्या टप्प्यात प्रवेश केल्याने शहरात पुर्वी कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आल्याने लागण झालेल्यांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे घाबरुन जायचे कारण नाही. प्रशासनाने जवळपास २५ हजार बेडस्ची तयारी केली आहे. नायडू रुग्णालयात आता बेडस् शिल्लक नसून बोपोडी, धायरीतील लायुगडे रुग्णालयात त्यानंतर लवळेच्या सिम्बायोसीस आयसोलेशनमधील २०० बेडस्ची सुविधा केली आहे. त्यामुळे संख्या वाढली तरी नागरिकांनी घाबरून जावू नये. अगदी गरिबातील गरिब रुग्णावर प्रशासनाकडून इलाज केले जात आहेत. रुग्णांची संख्या वाढू नये, याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घ्यावी, असे आवाहनही गायकवाड यांनी केले आहे.