मुंबई दि १५ : – घाटकोपर केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे . लॉकडाऊन हा कोरोना टाळण्याचा एकमेव उपाय असल्याने सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे . सध्य परिस्थिती पाहता लॉकडाऊन आपल्या देशात , राज्यात यशस्वी होत आहे मात्र काही लोक मुद्दाम या लॉकडाऊनच उल्लंघन करत असल्याने त्याचे दुष्परिणाम समोर येत आहे . रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीब , मजुरांचा सरकार काळजी वाहत आहे . त्यांना सर्वोत्तपरी मदत करत असताना कामगारांनो आपल्या घराकडे जाण्यासाठी घाई करू नका , धीर सोडू नका असे उत्तर भारतीय एकता समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंह म्हणाले . मंगळवारी बांद्रा स्थानकावर सांय लोकांनी गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता . ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सूक्ष्म लाठीचार्ज देखील करावा लागला . सरकार कामगारांसाठी आवाहन करत असताना कामगारांनी गोंधळून न जाता सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे . कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने सरकार हा निर्णय घेत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनांचे कामगारांनी पालन करून सहकार्य करावे असेही अशोक सिंह म्हणाले . अशोक सिंह यांच्या माध्यमातून लॉकडाऊन मध्ये अनेक बिगर कामगार , मजदूर याना धान्यवाटप , मास्क देण्याचे कार्य सुरू आहे .
मुंबई प्रतिनिधी :- बाळु राऊत