पुणे दि २३ :- पुणे विद्यापीठासमोरील उड्डाणपुल पाडण्याच्या काम चालू असतानाच शुक्रवार (ता.२४) पासून लॉकडाऊन संपणार असल्याने विद्यापीठ चौकात रहदारीवेळी वाहतूक समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वाहतूक शाखेने वाहतूक बदलण्याबरोबरच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) विद्यापीठ चौकात उड्डाणपूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे नियोजन केले आहे. तसेच तेथे मेट्रो पूल देखील बांधला जाणार आहे. त्यानुसार मागील आठवड्यात लॉकडाऊन सुरु होताच पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले.होते व पहिल्या टप्यात विद्यापीठ चौकात उतरणारा व पाषाणकडे जाणाऱ्या पुल तोडण्यात आला आहे. बाणेरकडे जाणारा पूल तोडला व चतुर्शिंगी कडून ई-स्क्वेअर पुला खालुन जाणार हाई रस्ता वरून पूल तोडला आहे
असा आहे वाहतूक बदल
– औंध, बाणेर, पाषाण येथून येणाऱ्या वाहनाना विद्यापीठ चौकातुन सरळ शिवाजीनगरला जाता येईल.- चतु:शृंगी कॉर्नरवरुन सेनापती बापट रस्त्यावर वळता येणार नाही.- शिवाजीनगरहून सेंट्रल मॉलपासून काही मीटर अंतरावर असलेल्या धोत्रे पथावरुन ओम सुपर मार्केट, जेडब्ल्यू मेरीयट हॉटेल चौक व चतु:शृंगी कॉर्नर व विद्यापीठ चौक- औंधकडे जाणाऱ्या वाहनाना औंधकडुन येणाऱ्या रस्त्यावर केलेल्या दुहेरी मार्गातुन राजभवनपर्यंत व तेथुन सरळ रस्तयाने जाता येईल. पाषाणकडे नेहमीप्रमाणे जाता येईल. तर बाणेरकडे जाणाऱ्या वाहनाना अभिमान श्री सोसयटीला वळस घालुन पुढे जाता येईल.- विद्यापीठ चौकातील ताण टाळण्यासाठी वाहनचालकांनी खडकी मार्गे किंवा चांदणी चौक मार्गे पुण्यात जाण्यास प्राधान्य देण्याचे पोलिसांचे आवाहन असे आहे वाहतुकीचे नियोजन चतु:शृंगी वाहतूक शाखेचे 30 पोलिस कर्मचारी तीन टप्प्यात शुक्रवारपासून विद्यापीठ चौक आणि परिसरात कार्यरत राहणार आहेत. “सकाळी आणि सायंकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मागील लॉकडाऊन पाहता वाहने कमी प्रमाणात येतील असे वाटत आहे, तरीही वाहनांची गर्दी किती होईल, याबाबत उद्याच कळेल.” असे आमच्या प्रतिनिधी शी बोलताना- प्रकाश मोरे, सहायक पोलिस निरीक्षक, चतु:शृंगी वाहतूक विभाग यांनी सांगितले आहे