पुणे दि ६ :- पुणे वीज कंत्राटी कामगार कृती समितीच्या वतीने सर्व वीज कंत्राटी कामगारांनी विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
यापूर्वी सात व आठ जुलै रोजी राज्यातील हजारो वीज कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते मात्र ऊर्जा मंत्र्यांनी मीटिंग घेऊ असे आश्वासन दिल्याने त्यावेळी आंदोलन स्थगित केले होते मात्र ऊर्जामंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने आजपासून पुन्हा बेमुदत आंदोलन वीज कंत्राटी कामगार कृती समितीने सुरू केले आहे.महावितरण मध्ये भरती करा पण कंत्राटी कामगार घरी जाणार नाही याची लिखित खात्री ऊर्जा मंत्रांनी द्यावी,कंत्राटी कामगारांनी जेवढी वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम केलं तेवढी वर्षे त्यांना भरती दरम्यान वयात सवलत मिळावी,त्यांना भरतीमध्ये पन्नास टक्के विशेष बाब म्हणून आरक्षण देऊन सामावून घ्यावे,शासनाच्या इतर खात्यात चतुर्थश्रेणीसाठी जी वयोमर्यादा लागू आहे तीच वयोमर्यादा वीज उद्योगात ठेवावी,महावितरण ची विद्युत सहाय्यक ही भरती एसीसी च्या मार्क मेरिट नुसार न लावता वीज उद्योगाशी संबंधित व्यवसायिक शिक्षण असलेल्या आयटीआय विजतंत्रि तारतंत्री च्या मेरिट नुसार करावी,कंत्राटी कामगार पद्धत कायमच बंद करावी आणि वीज कंत्राटी कामगारांना शास्वत रोजगार द्यावा यामुळे वीज कंपनीचे 25 टक्के रुपये वाचून अब्जावधी रुपयांचा फायदा होईल असा दावा यावेळी वीज कंत्राटी कामगार कृती समितीने केला आहे.मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात मुंबई पोलिसांनी कोरोनाचे कारण देत परवानगी नाकारल्याने कंत्राटी कामगार अधिक आक्रमक झाले आहेत या राज्यात न्याय मिळणे दुरापस्त झाले आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जय कामगार ही घोषणा केली मात्र कामगारांच्या पदरी निराशाच येत आहे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कायम कामगारांच्या मीटिंग घेऊन त्यांचे प्रश्न निकाली काढले मात्र कंत्राटी कामगारांच्या प्रश्नात लवकर लक्ष घालून या कामगारांना त्वरित न्याय मिळावा यासाठी राज्यातील प्रमुख कंत्राटी कामगार संघटनांची कृती समिती स्थापन झाली आहे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन व महाराष्ट्र ब्रह्मास्रोत वीज कंत्राटी कामगार संघटना अशा तिन्ही संघटनांच्या कंत्राटी कामगारांनी एकत्र येत आता न्याय मिळेपर्यंत शासनाशी लढा देण्याचा निर्धार केला आहे.