पुणे ग्रामीण दि २७ :- पुणे-नगर महामार्गावर वाघोली पासून रस्त्याच्या सहापदरी करण्याचे काम सुरू आहे.या रस्त्या रुंदीकरणाबरोबरच रस्त्याच्या कडेला येणाऱ्या विद्युत खांब,भूमिगत असलेल्या विद्युत केबल या देखील स्थलांतरीत करण्याबाबत तरतूद असताना त्या आहेत त्याच ठिकाणी ठेऊन काम चालू आहे. परंतु रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या कडेच्या विद्युत वाहिनीचे खांब स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. हे काम करत असताना नवीन लोखंडी विद्युत खांब उभारण्यत आले आहे,परंतु या खांबावरती नवीन विद्युत तारा बसवणे गरजेचे असताना जुन्याच वीजतारा वापरण्यात आल्या आहेत.तर वाघोली च्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा वाघेश्वर फिडर हा २०१४ साली अंदाजे ५ कोटी रुपये खर्च करून बसवण्यात आला होता आता त्याचे देखील स्थलांतर होणे गरजेचे असताना तो देखील तसाच ठेवून त्यावरूनच रस्त्याचे काम सुरू आहे, जवळपास संपुर्ण गावाला विद्युत पुरवठा करणारा पूर्वरंग फिडर याचे देखील २०१५ साली अंदाजे ७ कोटी रुपये खर्च करून काम करण्यात आले आहे तो देखील स्थलांतरित न करता त्यावरच काम सुरू आहे आहे. तर यालाच समांतर असणारी बॅकअप साठी वापरणारी तिसऱ्या विद्युत वाहिनी देखील स्थलांतरीत होताना दिसत नाही.विशेष म्हणजे हे सर्व काम करत असताना महावितरणच्या देखरेखी खाली हे काम होणे गरजेचे आहे.यासाठी अंदाजपत्रकामध्ये १.३% रक्कम महावितरणला देण्यात आली आहे. परंतु महावितणचे कोणते अधिकारी हे काम सुरू असताना घटनास्थळीच दिसत नाही असा नागरिकांचा आरोप आहे.त्यामुळे एकूणच सुरु असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणे गडबड घोटाळा असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी केला आहे.
तर प्राथमिक माहिती नुसार जे जुने साहित्य बदलण्यात आले आहे ते साहित्यात काम झाल्यानंतर महावितरणच्या गोडावूनला संबंधित ठेकेदारने जमा करणे गरजेचे असते त्यावेळी काम झाल्यानंतर हे साहित्य देखील अधिकारी तपासून घेणार का? अशाच प्रकार तेथेही होणार अशा प्रश्न वाघोलीतील सुज्ञ नागरिकांना पडला आहे.तर संबधित कामे करताना शासनाच्या नियमानुसार कामाचा बाबत माहिती देणारा फलक संबधित ठिकाणी लावणे गरजेचे असतानाही असा फलक आढळून येत नाही.तर विद्युत लाइनचे काम करताना याचे टेडर निघणे गरजेचे असताना ते देखील न काढता ओळखीच्या व्यक्तीला काम दिल्याचा आरोप वाघमारे करत आहेत.त्यामुळे आता या संपुर्ण कामाचे आॕडिट होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
**************
संबधित केबल स्थलांतरीत करण्याचे काम मुळ ठेकेदाराचे आहे.परंतु सर्वच केबल स्थलांतरीत होउ शकत नाही त्यासाठी मोठा खर्च येणार असून अंदाजे 22 कोटी पर्यत हे जावू शकते.परंतु निधी अभावी आज महावितरणला गरज वाटेल त्याच ठिकाणी खर्च केला जाइल.
मिलिंद बारभाई ,पूर्व विभाग कार्यकारी अभियंता
***************
जुन्या केबल काढणे शक्य नसल्याने लवकरच आमच्या हद्दीत नवीन केबल टाकण्यात येतील आणि आम्ही जेवढे काम करु तेवढेच बील आम्हांला भेटणार आहे.
सोपान बेल्हेकर ठेकेदार,
***************
रस्त्याचे काम करताना खराब झालेल्या (तीन) फिडरचे (केबल)जे रोडच्या मध्ये गाडले असून वरिष्ठांच्या आदेश असताना त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे महावितरण’ने हे तीनही फिडर शिफ्टिंग करून नवीन न टाकल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भेटून निवेदन देणार
सर्जेराव वाघमारे, कोरेगाव भीमा विजय रण स्तंभ अध्यक्ष.