रत्नागिरी दि ०६: – लांजा तालुक्यातील भांबेड कोलेवाडी येथील संजय लांबोरे या ३५ वर्षीय तरुणाला २९ ऑक्टोबर रोजी सर्पदंश झाला होता त्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या मृत्युप्रकरणी समाजात प्रचंड असंतोष आहे. यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संजय लांबोरे मृत्यू प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संतोष येडगे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
संजय लांबोरे मृत्यू प्रकरणी समाजातील असंतोष लक्षात घेता संतोष येडगे यांनी मंत्री राजेश टोपे यांचे लक्ष वेधून कारवाई करण्यासाठी निवेदन सादर केले आहे तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना ही निवेदन देण्यात आले आहे मंत्री उदय सामंत यांनी या स्थानिक मुद्दा लक्षात घेवून संजय लांबोरे मृत्यू प्रकरणी त्यांच्या गरीब कुटुंबाला सांत्वनपर भेट द्यावी आणि कुटुंबाचा आधार असलेल्या संजय च्या पालकांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी श्री.येडगे यांनी केली आहे तर मंत्री उदय सामंत यांनी लांजा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेतील दोष दुरुस्त करून चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक घेवून संबंधित आरोग्य यंत्रणेला निर्देश देण्याची मागणीही संतोष येडगे यांनी यावेळी केली.
रत्नागिरी प्रतिनिधी :- संतोष येडगे