मुंबई दि ०५ : – बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर, जि. रत्नागिरी (रजि) या संस्थेच्या वतीने दि. ७ मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या निमित्त ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन कऱण्यात आले होते, त्या स्पर्धेचा निकाल, तसेच भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून संघाच्या “नववर्षे २०२१ शास्ता दिनदर्शिकेचे” प्रकाशन सोहळा दि. ३ जानेवारी २०२१ रोजी मा. सिद्धार्थ पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा येथे संयुक्तरित्या आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सरचिटणीस संजयजी तांबे यांनी केले तर प्रास्ताविक सादर करताना कार्याध्यक्ष दिपकजी मोहिते यांनी लॉकडाऊन काळात संघाने यशस्वीरित्या राबलेल्या उपक्रम व योजनांची माहिती सभागृहास करून दिली त्याचसोबत लवकरच संघाची पतपेढी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यानी आपल्या प्रास्ताविकात दिली, त्याचसोबत निबंध स्पर्धा निकाल व “शास्ता दिनदर्शिका” प्रकाशन सोहळा बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस लक्ष्मणजी भगत, प्रमुख विश्वस्त संजयजी पवार, विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, के. सी. जाधव, माजी विश्वस्त एस. बी. जाधव, कार्याध्यक्ष दीपकजी मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
“शास्ता दिनदर्शिका” प्रकाशन सोहळ्यादिनी जाहीर करण्यात आलेल्या निबंध आणि स्पर्धक यांची नावे पुढीलप्रमाणे :
प्रथम पारितोषिक : वैशाली आनंद पवार (वरवेली)
विषय : स्त्री जन्मा हि तुझी कहाणी द्वितीय पारितोषिक : मिलिंद कृष्णा कदम (विसापूर) विषय : डॉ. बाबासाहेब आणि आजचे आपले जीवन तृतीय पारितोषिक :विधी विरेंद्र गमरे (मुंढर)
विषय : डॉ. बाबासाहेब आणि आजचे आपले जीवन
विभागवार उत्कृष्ट ठरलेले निबंध आणि स्पर्धेक यांची नावे :
गुहागर विभाग 1 : सोनाली मिलिंद पवार (वरवेली) विषय : डॉ. बाबासाहेब आणि जलसंधारण पेवे विभाग 2 : संदीप यशवंत कदम (पेवे) विषय : स्त्री जन्मा हि तुझी कहाणी गिमवी विभाग 3 : रोहित श्रीधर गमरे (मुंढर) विषय : डॉ. बाबासाहेब आणि आजचे आपले जीवन वेळब विभाग 4 : अमित काशीराम मोहिते (कोतळूक) विषय : शैक्षणिक, महिला, कामगार आणि शेतकरी याच्या बाबत बाबासाहेब याचे विचार पिंपर विभाग 5 : दिपाली रविंद्र नागे (पालशेत)विषय : शैक्षणिक, महिला, कामगार आणि शेतकरी यांच्याबाबत बाबासाहेब याचे विचार कुडली विभाग 7 : सुबोध संतोष सुर्वे (सडेजांभारी) विषय : शैक्षणिक, महिला, कामगार आणि शेतकरी यांच्याबाबत बाबासाहेब यांचे विचार.
सदर कार्यक्रमाची सांगता सचिन पवार यांच्या आभार प्रदर्शन भाषणाने करण्यात आली ज्यात त्यांनी सर्व विजेत्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचे कौतुक करून, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य व परिश्रम करणाऱ्या विभाग अधिकारी व सर्व उपसमितीच्या प्रमुखांचे आभार मानले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता केली.
मुंबई आलीबाग प्रतिनिधी :- प्रवीण रा. रसाळ, मराठी वृत्तपत्रलेखक