अमरावती दि १६ :- जयभारत मंगल कार्यालय अमरावती येथे दिनांक १४ फेब्रुवारीला २०२१ मराठा तेली समाज विकास मंडळाद्वारे आयोजित शिक्षकांचे स्नेहसंमेलन अगदी आनंदी वातावरणात संपन्न झाले. मराठा तेली समाजात अनेक शिक्षक आहेत पण आपला एकमेकांचा प्रत्यक्ष परीचय नसल्याने आपण एकजुठ नाही.शिक्षकांचे पण संघटन निर्माण व्हावे,शिक्षकांना योग्य तो वाव समाजात मिळावा,शिक्षकांची एक साखळी निर्माण व्हावी.व मजबुत अशे संघटन निर्माण व्हावे यासाठी प्रत्येक गावातील ,तालुक्यातील, व शहरातील शिक्षक समाज बांधव एकञ येण्याची गरज आहे. अशे प्रतिपादन प्रा.डॉ.संंजय तिरथकर यांनी आजच्या या शिक्षक सभेला संबोधीत करतांना सांगितले .यावेळी शिक्षकांना संघटित करण्याची जबाबदारी ही संजय एकनाथ तायवाडे यांना देण्यात आली व उपस्थित सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेशराव बाभुळकर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच नुकत्याच जाहीर झालेला राष्ट्रपती पुरस्कार सन्मानीत अशोक मांगलेकर व छञपती पुरस्कार प्राप्त मंगेश व्यवहारे सर यांचा मान्यवंराचे हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.संजय तिरथकर ,सहसचिव नितीन बाखडे ,संचालक प्रा.स्वप्निल खेडकर ,अशोक मांगलेकर ,अशोक देशकर, प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच मोठ्या प्रमाणात शिक्षक बांधव म्हणुन संजय तायवाडे ,रमेशराव बाभुळकर, गजानन पाचपोर, प्रविण बाखडे, मंगेश व्यवहारे, निलीमा राजुरकर, शोभा बाभुळकर,आशा तायवाडे ,संदीपा राजुरकर,सोनाली जंगले यावेळी सभेला उपस्थित होते.