• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/06/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२९ :- मागील ३०० वर्षांमध्ये ज्या वेगाने भारत देश पुढे गेला नाही, त्यापेक्षा जास्त वेगाने पुढील २५ ते ३० वर्षात भारत पुढे जाणार आहे. देशातील युवा पिढीवर शिक्षक व कुटुंबियांकडून होत असलेले संस्कार यांमुळे ती सशक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत भारताचे वाढते स्थान आणि युवा पिढीवर होणारे भारतीय संस्कार यामुळे देशाचे भविष्य उज्वल असल्याचे मत मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी पवनकुमार गुप्ता, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख, डॉ.संजीव डोळे, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अमोल केदारी, अक्षय गोडसे, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

सुधीर मेहता म्हणाले, देशात रोजगाराची कोणतीही कमी नाही. ज्याच्याकडे चांगली कौशल्ये आहेत, ती युवा पिढी पुढे जात आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच कौशल्य आत्मसात करणे देखील गरजेचे आहे. नोकरी करणा-यांप्रमाणे नोकरी देणारे कसे वाढतील, हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना व्यवसायाची आवड आहे, त्यांनी त्या क्षेत्राकडे आवर्जून वळायला हवे.

डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, कोविड काळात आॅनलाईन शिक्षण होऊनही यावेळच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. त्यामुळे हे त्यांचे स्वत:चे व स्वत:च्या अभ्यासाचे यश आहे. भविष्यात देखील करिअरच्या वाटेवर जाताना परिश्रम, धाडस, आत्मविश्वास व अभ्यास या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातूनच समाजाची आर्थिक स्थिती मोठी होईल आणि गरीब व श्रीमंती ही दरी मिटविण्यास मदत होईल.

प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन केले जाते. सन २०१० साली ट्रस्टने जय गणेश पालकत्व योजना सुरु केली. पहिल्या वर्षी ४५० विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला, ही संख्या आता वाढत आहे. शिक्षणाच्या दृष्टीने व्यापक दृष्टीकोन ठेऊन ट्रस्ट काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

Tags: श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट
Previous Post

प्रदेश तेली महासंघाची जिल्हा, तालुका, व पुणे शहर कार्यकर्ता बैठक पुण्यात संपन्न

Next Post

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवा

Next Post

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवा

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist