जळगांव दि,१६ :- महावितरण कंपनीने सध्या आर.ए.पि.डी.आर.पी. टाऊनमध्ये आर.एफ. जुने काढून नवीन मिटर लावण्याचे काम सुरु झाले आहे. सदर मिटरबदल टेंडर हे जिनस कंपनीला 125 करोड मध्ये दिले असुन त्यांना नवीन मिटर बनवून देणे व बसवून देणे असा करार केला आहे. जळगांव जिल्ह्यात भुसावळ, चोपडा, धरणगांव, पारोळा, एरंडोल, पाचोरा येथे काम सुरु करण्याचे आदेशही देण्यात आले. त्या पैकी भुसावळ, धरणगांव, एरंडोल येथील जागृक जनता व लोकाभिमुख राजकारण्यांनी तिव्र विरोध करुन हे काम थांबवले आहे व आमचे जुने मिटर चांगले असतांना हे जलद मिटर बसविण्या फार्स का असा सवाल केला जात आहे.
चोपडा गावात मात्र असा कोणताही विरोध कोणाकडूनही दिसुन आला नाही. वास्तविक पाहता हे मिटर पुर्विच्या मिटर्सपेक्षा फारच फास्ट असल्याची तक्रार नागरिक करत आहेत व त्याचा भुर्दंड हा सामान्य जनतेला फार मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.
मागे आपले एनर्जि आॅडीट मेंटेन करण्यासाठी शेतिपंप ग्राहकांनाही कंपनिने असाच 5 एच पी ला 7.5 एच पी किंवा 7.5 एचपी ला 9 एचपी चे बिल देऊन भुर्दंड दिला जात होता.
आता पुन्हा एकदा ग्राहकांना जबरदस्तिने जुने काढून नवीन मिटर लावले जात आहे.स्वतः महावितरणचे अधिकारीही या प्रकारावर शंका घेऊन काळजीत आहेत कारण ग्राऊंडलेव्हलला त्रास त्यांना सहन करावा लागणार आहे.
विलास पाटील ( चौधरी ) जळगाव प्रतिनिधी