• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Saturday, March 25, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

अतिवृष्टी बाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/08/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
अतिवृष्टी बाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा
0
SHARES
51
VIEWS

पुणे, दि. ११:- राज्यातील 21 जिल्ह्यातील 2 हजार177 जिल्हा परिषद शाळांना फटका बसला असून त्यांची दुरुस्ती व पोषण आहार,शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी शाळांना 57 कोटीचा निधी आवश्यक असून तो निधी तातडीने शिक्षण विभागाकडून खासबाब म्हणून देण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांनी आज पुण्यात केली.राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण विभागाकडून घेण्यात येत असून. त्याचा एकत्रित आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री अँड आशिष शेलार तातडीने पुणे दौऱ्यावर आले होते. पुर परिस्थिती ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळून पुर बाधित जिल्ह्यातील संबंधितांची आढावा बैठक पुणे येथे घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्हे आणि तालुका निहाय शाळांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.राज्यातील अतिवृष्टी मुळे आठ शिक्षण विभागापैकी सहा विभाग पुर परिस्थितीने बाधित झाले असून 21 जिल्ह्यातील 155 तालुक्यात नुकसान झाले आहे. या 21 जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2 हजार 177 शाळा बाधित झाल्या आहेत. याचा फटका 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थ्यांना बसेल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. तातडीने 53 पुर्ण वर्ग खोल्याचे बांधकाम करावे लागणार असून 2 हजार 177 शाळांच्या वर्ग खोल्या दुरुस्ती करावी लागणार आहे. 36 किचनशेड बाधित झाले असून 477 शाळांमध्ये शालेय पोषण आहार बाधीत झाला आहे. तर 260 शाळांमधील 27905 विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके ही पुरामुळे बाधित झाली आहेत. एकंदरीत यासाठी रुपये 57 कोटी एवढ्या निधिची गरज असल्याचे विभागीय उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविलेल्या अहवालातील माहिती आजच्या बैठकीत अँड. आशिष शेलार यांच्या समोर संबंधित अधिकाऱ्यांनी मांडली.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अडचणीत येऊ नये आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंत्री अँड. अशिष शेलार यांनी खास बाब म्हणून 57 कोटीचा निधी शिक्षण विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल असे या बैठकीत घोषित केले.

हा निधी थेट शाळेच्या बँक खात्यामधे जमा करण्यात येणार असून स्थानिक पातळीवर दुरुस्ती करण्यात येणार आहे.
पूरग्रस्त भागातील शाळा पुन्हा सुरू करताना आरोग्याच्या दृष्टीने तो संपूर्ण शाळा परिसर संबंधित शासकीय यंत्रणेकडून निर्जंतुक करण्यात यावा तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व वर्गखोल्यांची स्वच्छता याबबात सविस्तर परिपत्रक शिक्षण विभागाने काढावे असे निर्देश या बैठकीत शिक्षण मंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. ज्या शाळांमध्ये पुरग्रस्तांसाठी तात्पुरती निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे, आशा शाळांतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नजीकच्या खाजगी शाळांमध्ये करता येईल का? अथवा दोन सत्रात शाळा भरविण्याची व्यवस्था होऊ शकते का ? याबबात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा असे निर्देश बैठकीत शिक्षण अधिकार्‍यांना शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले. ज्या ठिकाणी पुर परिस्थितीमुळे शाळा पुन्हा वापरताना योग्य ती स्वच्छता करण्यात यावी याबाबतही सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
पुर परिस्थ्ति नियंत्रणात आल्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्हयांची माहिती गोळाकरून त्यांचाही या योजनेत समावेश करून त्यांनाही निधि उपलब्ध करून देण्यात येईल. पुर परिस्थिति नियंत्रणात आल्याननंतर तातडीने शाळा दुरूस्ती होऊन शैक्षणिक कामकाज सुरू व्हावे, याउद्देशाने व विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आयोजित केलेल्या या बैठकीला अप्पर मुख्य सचिव शिक्षण विभाग वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण विभागातील सर्व संचालक, बालभारती, बोर्डाचे अध्यक्ष व सचिव आणि संबंधित बाधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

पुणे शहरातून सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे पथक रवाना

Next Post

आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Next Post
आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: