आरवली दि ०३ :- प्रतीनीधी :-मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण काम करणाऱ्या कंपनीचे मुदतबाह्य काम रखडल्याने तुकाराम येडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता यांना निवेदन दिले असता संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयाने २७ डिसेंबर २०१९ रोजी दिले आहेत तुकाराम येडगे यांच्या निवेदनाची दखल घेवून आवश्यक कार्यवाही करुन सदर कार्यवाहीचा अहवाल तुकाराम येडगे आणि मुख्य अभियंता यांच्या सह सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाला सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिक्षक अभियंता यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे रत्नागिरी कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे आरवली ते कांटे व कांटे ते वाकेड या दोन टप्प्यातील पहीला टप्पा आरवली ते कांटे कि.मी २४१ ते २८१ या ४० कि.मी तर कि.मी २८१ ते ३३२ या दोन टप्प्यात निविदा काढण्यात आल्या आहेत सदरच्या दोन्ही टप्प्यातील कामे २३ जून २०१६ रोजी मुंबईतील कंपनीला देण्यात आली आहेत सदरच्या कंपनीने विहीत मुदतीत म्हणजेच १२ मार्च २०२० रोजी ७३० दिवसांत महामार्ग चौपदरीकरण कामे पूर्ण करावयाची आहेत मात्र कंपनीने विहीत मुदतीत कामे पूर्ण केली नसल्याने स्थानिक जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे या कंपनीवर दंडात्मक स्वरुपाची कडक कारवाई करुन कंपनीची बीले तातडीने थांबविण्यासंदर्भात संतोष येडगे यांनी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे ( महाराष्ट्र प्रदेश ) मुख्य अभियंता विनय देशपांडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व कारवाई साठी त्यांना निवेदन देण्यात आले कंपनीच्या जनविरोधी भुमिकेला कोकणातील जनता कंटाळली असून उर्वरित महामार्गाचे काम प्रगतीपथावर असताना फक्त ९० कि.मी मधील काम रखडल्याने संबंधित ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण काम करणाऱ्या एम.ई.पी संजोस रत्नागिरी या कंपनीने २८ जून २०१६ ते ७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत आरवली ते कांटे ४ टक्के तर कांटे ते वाकेड १०.५० टक्केच काम करण्यात आले आहे राष्ट्रीय विभागाकडून कामात प्रगती करण्याची तीन महिन्यांसाठी वाढीव संधी देण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले मात्र दिलेल्या संधीतून कंपनीने आपल्या कामात प्रगती दाखवण्याची तसदी दाखवली नाही जनतेला आणि पर्यायाने राष्ट्रीय महामार्ग विभागाला वेठीस धरुन नव्हे तर न जुमानता सदरची ठेकेदार कंपनी एकाधिकारशाही गाजवत असल्याचे दिसून आले आहे अशा बेजबाबदार कंपनीला काळ्या यादीत टाकून हाती असलेल्या प्रकल्पाच्या कामांसंदर्भात कठोर कारवाई करावी अशी प्रामुख्याची मागणी असल्याचा मुद्दा या दिलेल्या निवेदनात मांडण्यात आला होता
एम.ई.पी या कंस्ट्रक्शन कंपनीने २८ जून २०१६ रोजी काम घेतल्यापासून महामार्ग चौपदरीकरण कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून आरवली ते वाकेड दरम्यान मुंबई – गोवा महामार्गाची दुरावस्था झाली असल्याचे निदर्शनास येत आहे तर काही ठिकाणी अर्धवट काम करुन ठेवल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे .
रत्नागिरी प्रतीनीधी :- संतोष येडगे