श्रीगोंदा दि.९:- बहुतांश वेळेला चोरीला गेलेल्या ऐवजावर अनेकांना पाणी सोडावे लागते. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी, पिंपळगाव पिसा येथील सुनिल बबन पारखे यांच्या घरातील चोरीला गेलेला ऐवज पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाला. आपल्या चोरीला गेलेल्या दागिन्यांवर पाणी सोडून दिलेल्या सुनिल बबन पारखे यांना सुखद अनुभव मिळाला आहे. सुनिल बबन पारखे (रा.खरातवाडी,पिंपळगाव पिसा,ता.श्रीगोंदा)यांच्या घरी ९/१/२०२१ रोजी चोरी झाली होती. व बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या चोरीत ५० हजार रू. किमतीची एक सोन्याची अंगठी,दोन सोन्याचे गंठन २ लाख रु.किमतीचे,एक सोन्याचा नेकलेस५०
हजार रु.किमतीचा,एक सोन्याचा राणी हार १ लाख५० हजार रु किमतीचा,दोन कानातील सोन्याचे फुले झुबे २५ हजार रु.किमतीचे असे एकुण अंदाजे ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार बेलवंडी पोलिसांनी गुन्ह्याचा कसून तपास करीत चोरांना अटक केले होते व मुद्देमाल जप्त केला होता व कोर्ट आदेशानुसार पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,तपासी अंमलदार पी.एस.आय प्रकाश बोराडे,सहाय्यक फौजदार बजरंग गवळी,पो.हे.कॉ.हसन शेख यांच्या समक्ष मुद्देमाल सुनील बबन पारखे यांचेकडे सुपूर्त करण्यात आला.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे