कर्जत दि.२८ मागील काही दिवसांपासून कर्जतमध्ये अवैध सावकारीचा कळस झाला आहे. त्यामुळं शहरात रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सावकारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ‘शेतकऱ्यांनी सावकारांकडुन व्याजाने घेतलेले पैसे अनेक अडचणींमुळे वेळेवर देता येत नाहीत.त्यामुळे सावकारांकडुन थेट जमिनीच आपल्या नावावर करून देण्याचा तगादा लावला जातो.आर्थिकदृष्ट्या खचलेला शेतकरी घेतलेली रक्कम दिल्यावर जमीन परत देण्याच्या बोलीवर त्यांच्या नावावर जमिनी लिहून देतो मात्र कमी किमतीत लाखो रुपयांची जमीन मिळाल्यावर त्यांची नियत बदलते आणि जमीन परत देण्यास नकार दिला जातो.त्यामुळे काहीही झाले तरी शेतकऱ्यांनो कुणीही जमिनी लिहून देऊ नका’ असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.बेकायदेशीर सावकारीच्या समुळ उच्चाटनासाठी कर्जतचे कृतिशील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दमदार पाऊल टाकले आणि तालुक्यातील अनेक गोरगरीब कुटुंबांच्या गळ्यातले सावकारकीचे फास सैल झाले.मात्र या सावकरकीच्या प्रकरणांनी आता वेगळेच वळण घेतले असल्याचे निदर्शनास येत आहे.व्याजाचे पैसे किंवा मुद्दलीची रक्कम ठरलेल्या वेळेत दिली नाही तर तुटपुंज्या रकमेत चक्क लाखो रुपयांची जमीन सावकारांकडून आपल्या घशात घालण्याचे प्रकार यापुर्वी घडले आहेत.परस्पर व्याजापोटी जमिनी लिहून घेण्याच्या तयारीतही अनेक सावकार आहेत.मात्र एकदा जमीन लिहून दिल्यास ती पुन्हा माघारी घेण्यास खुप अडचणी येतात.कमी रकमेत बक्कळ आर्थिक रकमेची स्थावर मालमत्ता सावकाराच्या हाती लागते.त्यामुळे परस्पर व्यवहार मिटवताना व तडजोड करताना असा प्रकार कुणाबाबत घडण्याची चिन्हे असतील तर वेळीच सावध होऊन कर्जत पोलिसांना त्यासंदर्भात माहिती देणे गरजेचे आहे किमान स्वतःच्या मालकीच्या जमिनी तरी सावकारांच्या ताब्यात जाण्यापासुन वाचतील.या अगोदरही व्याजापोटी सावकारांनी लिहून घेतलेल्या तालुक्यातील अनेक जमिनी कर्जत पोलिसांनी शेतकऱ्यांना मिळवुन दिल्या आहेत.यात अनेक बड्या सावकारांवर गुन्हे दाखल करून प्रसंगी त्यांना जेरबंद करण्याची कारवाईही करण्यात आली. त्यामुळेही अनेक सावकारांनी याची धास्ती घेतलेली आहे.सावकारांविरोधात सुरू केलेली ही मोहीम सर्वसामान्यांना दिलासा देणारी ठरत आहे. एका दिवसात समोर आली चार प्रकरणे!
गेली तिन दिवसांपुर्वी वडगाव तनपुरा येथील शेतकऱ्याची जमीन शिंदेवाडीच्या सावकाराने आपल्या नावे लिहून घेतली होती. ही जमीन पोलीस निरीक्षकांमुळे संबंधित शेतकऱ्याला मिळाली.या घटनेनंतर एकाच दिवसात अशी आणखी चार प्रकरणे कर्जत पोलिसांकडे आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे